top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 22
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

श्री रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने एक नवीन राजकीय व्युहरचना करीत आहेत. माझ्या मते या नव्या राजकीय समीकरणांमध्ये प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया मधील माहितगार अनुभवी तज्ज्ञ जनरेशन नेक्स्ट मधील उपयुक्त आणि उपद्रव मूल्य सिद्ध केलेल्या पत्रकारांचा अधिक सन्मानपूर्वक उपयोग करून घेतला पाहिजे. आज माझ्यासारखा सम्यक दृष्टी आणि सर्वशक्तिमान भाजपा पदाधिकारी पत्रकार भाजपासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो पण पक्षाकडून संवाद संपर्क साधला जात नाही ही व्यथा आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून ह्या संदर्भात पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा भाजपाचेच नुकसान संभवते. आज सूचना केली आहे आणि इशारा देण्याची गरज पडू नये अशी अपेक्षा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"गांधी घराण्यातील गुप्त राजकारण"

राहुल गांधी रोज आरडाओरडा करतात, मोदींच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभे करतात, पण खरे संकट त्यांना दिल्लीच्या बाहेर नाही तर घराच्या आत आहे. प्रियंका वाढरा शांतपणे आपला खेळ रचते आहे. मुलगा रेहान रॉबर्ट वाढरा याचे नाव बदलून रेहान राजीव गांधी केले गेले—हा पाऊल योगायोगाने नाही तर राजकीय वारसाहक्कासाठी टाकलेला धूर्त डाव आहे. राजीव गांधी जयंतीला प्रियंका व रॉबर्ट यांनी प्रार्थना केली, पण राहुलऐवजी प्रियंकाने रेहानला सोबत नेले. हे दृश्य योगायोग नाही; घराण्याच्या पुढच्या वारसाचा अनौपचारिक उद्घोष आहे. राहुलवर “नापास” शिक्का अधिक गडद होताना दिसतो, तर प्रियंका हळूहळू स्वतःसह भाच्याचे प्रमोशन पुढे नेत आहे. याच जाणिवेमुळे राहुल रोज पिसाळतोय, आरोपांच्या भाकड कथा रचतोय. खरी लढाई मोदींशी नाही, तर घरच्या वारसाहक्कासाठी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"थोरात–तांबे यांची राजकीय विसंगती" महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरात यांचे स्थान मान्य करावे लागेल. मात्र आजच्या वास्तवात त्यांची ताकद ही स्वतःच्या जनाधारावर नाही, तर देवेंद्र फडणवीसांशी असलेल्या वैयक्तिक समीकरणावर उभी आहे, हे कटू सत्य आहे. दुसरीकडे, अमोल खताळ यांचा विजय हा केवळ अपघाती नव्हता; तो विखे पाटील यांच्या संघटनशक्ती, लाडकी बहीण योजनेचा सामाजिक प्रभाव, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विस्थापित मराठा मतदारांचा पाठिंबा आणि ओबीसी ध्रुवीकरण या घटकांचा थेट परिणाम होता. सत्यजित तांबे यांच्या चेहऱ्यावर दिसणारे नाराजीचे भाव हे काँग्रेसमधील त्यांच्या अनिश्चित भूमिकेचे द्योतक आहे. शरीराने काँग्रेससोबत असले तरी मनाने फडणवीसांच्या जवळ असल्याची चर्चा व्यर्थ नाही. भाजपच्या तिकिटावर ते यशस्वी होऊ शकत नाहीत, हे वास्तव त्यांनाही माहीत आहे. संग्राम भंडाऱ्यांचा अतिरेकी उत्साह थोरातांना सहानुभूती मिळवून देईल कदाचित, पण ठोस राजकीय स्थैर्य मात्र देऊ शकणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"राहुल गांधींची विस्मृती आणि विरोधकांची सोय"२०१३ मध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत अचानक धडक देऊन फौजदारी कायदा (दुरुस्ती) अध्यादेश “कचऱ्यात टाकण्यासारखा” म्हणून फाडला होता. तेव्हा त्यांनी स्वतःला भ्रष्टाचारविरोधी नायक दाखवण्याचा स्वस्त प्रयत्न केला, तर प्रत्यक्ष उद्देश होता डागाळलेल्या यू पी ए सरकारची थोडी अब्रू वाचवणे. गंमत म्हणजे, ज्या लालू यादवांना वाचवण्यासाठी तो अध्यादेश आणला गेला, त्यांनाच नंतर तुरुंगाची हवा खावी लागली. आणि आज तेच राहुल गांधी त्याच लालूंच्या पायाशी पाणी सर्व्ह करताना दिसतात. इतिहासाचा हा उपहास पुरेसा आहे! आता नरेंद्र मोदी सरकारने १३०वा संविधान दुरुस्ती विधेयक आणून भ्रष्ट नेत्यांचे ‘जेलमधून सरकार’ चालवणे थांबवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस आणि विरोधक विरोध करतायत. मग प्रश्न असा — त्यांना खरेच लोकशाही हवी आहे का, की तुरुंगातून सत्तेचा डाव मांडणाऱ्यांची सोय?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"आम आदमी पक्षाचेच सुप्त षडयंत्र" दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे आरोपी राजेश साकारिया यांच्या आईने सांगितले, “माझ्या मुलाला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही; तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या भटक्या कुत्र्यांवरील आदेशामुळे रागावून दिल्लीला गेला होता.” मात्र, ही “मोटिव्ह क्लिअर” असली तरी, याचा वापर कोण करत आहे? सामान्य नागरिकाचा प्रतिकात्मक आरोप वाटतो; पण प्रत्यक्षात हे आम आदमी पक्षाचेच गुप्त खेळ वाटतो. एखादा रिक्षाचालक असो, किंबहुना एखादा पशुप्रिय व्यक्ती असो, तरी त्याला मुख्यमंत्रीवर हिंसक हल्ला करण्याची कारणी शक्ती सुरू करण्याचा अधिकार कोण देतो? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निषेध म्हणून हल्ला? ही लोकशाही नाही, ही अतर्क्य आणि भयभीत करणारी रणनीती आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"लोकशाहीवर गलिच्छ हल्ला" कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नसीर अहमद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना “वोट चोर” अशी गलिच्छ भाषा वापरली आणि लोकसभेत गदारोळ सुरू झाला. राजकीय विरोध असला तरी शब्दांची मर्यादा असते. मतदारांनी दिलेला प्रचंड जनादेश पचत नसल्यामुळे असे आरोप केले जात आहेत. मोदींनी पुन्हा पुन्हा जनतेचा विश्वास जिंकला आहे, हे सत्य बदलता येत नाही. हरलेले नेते आता सभागृहात आरडाओरड करून आपली झुंज देत आहेत. पण अशा निकृष्ट भाषणांनी ना जनता प्रभावित होते, ना विरोधकांचा दर्जा वाढतो. संसद, विधानपरिषद ही चर्चा व विकासासाठी आहेत; वैयक्तिक हल्ले करण्यासाठी नाहीत. अशा शिवीगाळीने फक्त काँग्रेसची राजकीय अधोगतीच अधिक उघडकीस येते. लोकशाहीत पराभव मान्य करायला धैर्य लागतं, अपमानकारक शब्द वापरायला नाही.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page