top of page

अमित साटम यांनी दिले मुंबईची सुरक्षा आणि विकासाला प्राधान्य

  • dhadakkamgarunion0
  • 3 days ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]

▪️==================▪️

अमित साटम यांनी दिले मुंबईची सुरक्षा आणि विकासाला प्राधान्य

● मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि येथील प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना चपराक देण्यासाठी आता खंबीर नेतृत्वाची गरज आहे. हे नेतृत्व एखादी माता किंवा बहीण करेल, असा विश्वास भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. यामुळे मुंबईचा कारभार अधिक सुरक्षित आणि जनहितार्थ होईल, असेही ते म्हणाले. शहराची सुरक्षा अबाधित राखणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. साटम यांच्या मते, मुंबईच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महिलांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरेल. 'पुढे पुढे पहा होतंय काय' असे म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. मुंबईच्या विकासाचा नवा आराखडा तयार असून, महिलांच्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल, असा दावा त्यांनी केला आहे. मुंबईचे नेतृत्व एका महिलेच्या हाती असणे हा संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा क्षण असेल, असेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page