top of page

राजकारणातील युत्या-आघाड्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सणसणीत टोला

  • dhadakkamgarunion0
  • Oct 16
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

राजकारणातील युत्या-आघाड्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सणसणीत टोला

● महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या विविध पक्षांच्या युती-आघाडीच्या चर्चा आणि राजकीय हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी 'कोण कोणाबरोबर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही,' असे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असतानाच, फडणवीस यांनी हे वक्तव्य करून एक प्रकारे विरोधकांना इशाराच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्वास दिसून येतो. 'राजकारणात कोणाची युती झाली किंवा कोणी दूर गेले, तरी भाजपा पक्ष केवळ सत्तेच्या जोरावर नव्हे, तर आपल्या कामाच्या बळावर विश्वास ठेवतो,' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमच्या सरकारने केलेल्या विकासकामांवर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भाजपावरील विश्वासावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे, इतर राजकीय पक्षांच्या कोणत्याही निर्णयामुळे आमच्या ध्येयधोरणांमध्ये बदल होणार नाही किंवा आमच्या कामावर परिणाम होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page