चव्हाण-शिंदे वाद संपुष्टात येणार; मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वास
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
चव्हाण-शिंदे वाद संपुष्टात येणार; मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वास
● गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपा यांच्यातील स्थानिक नेतृत्वाच्या वादामुळे निर्माण झालेला तणाव संपुष्टात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच एकत्र बसून जेवण करतील आणि त्यानंतर आपापसातील सर्व मतभेद संपुष्टात येतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या संघर्षाच्या चर्चांना फडणवीस यांच्या या विधानामुळे पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही पक्षांतील मतभेद दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधण्याचा निर्णय घेतला. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सलोखा राखणे आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. फडणवीस यांनी नुकतीच जाहीरपणे भूमिका मांडत हा वाद तात्काळ मिटवण्याचे संकेत दिले आहेत. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आल्यानंतर गैरसमज दूर होतील आणि सर्व मुद्दे संपुष्टात येतील, असे ते म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments