top of page

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 14
  • 3 min read

 अभिजीत राणे लिहितात

चार्ली कर्क – ट्रम्पचा हुकूमी एक्का गेला नेपाळमध्ये कम्युनिस्ट सत्तेला सुरुंग लागला आणि त्याचवेळी अमेरिकेत राजकीय वादळ उठलं—ट्रम्पचा सर्वात विश्वासू सहकारी चार्ली कर्क गोळीबारात ठार झाला. अमेरिकेत रोज होणाऱ्या गोळीबारांमध्ये ही घटना फारशी मोठी वाटू शकते; पण प्रत्यक्षात हा पोलिटिकल अस्सॅसिनेशन आहे. टर्निंग पॉइंट यू एस ए या संघटनेद्वारे चार्लीने डाव्या विचारसरणीच्या विद्यापीठांमध्ये पुरोगामी विद्यार्थ्यांचे जाळे तयार केले. “स्टॉप द स्टील ” पासून “फ्रिडम समिट्स ” पर्यंत, चार्ली कर्क ट्रम्पसाठी एक रणशिंगच होता. तोच ट्रम्पच्या पुनर्निवड मोहिमेचा युवा सेनापती होता. उटाह व्हॅली विश्व विद्यालय मधील कार्यक्रमात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जात असतानाच त्याला गोळी घातली गेली. १९८० मध्ये रेगनने दिलेला नारा—मेक अमेरिका ग्रेट अगेन —ट्रम्पने जपला, पण त्याचा खरा वारस चार्ली कर्क होता. त्याचा मृत्यू म्हणजे ट्रम्पचा हुकूमी एक्का गेला. ही फक्त गोळीबाराची बातमी नाही, तर अमेरिकन राजकारणातील भूकंप आहे.

 अभिजीत राणे लिहितात

भुजबळ–पवार आणि मागास वर्गीय राजकारणाचा धडा! स्टॅम्प घोटाळ्यात नार्को टेस्ट दरम्यान अब्दुल करीम तेलगीने घेतलेले छगन भुजबळ आणि शरद पवार यांचे नाव आजही आठवले जाते. त्या काळी ते आतून एक होते, आणि आजही तशीच छुपी समजुत दिसते. जातीय द्वेष पसरवून ओबीसी–मराठा संघर्ष वाढवणे हा फक्त समाजविघातक खेळ आहे. सोशल मीडियावर आई–बहिणीवरून चालणारे वाद निरर्थक आहेत. त्यातून फक्त डेटा खर्च होतो, रक्तदाब वाढतो आणि डॉक्टरांची कमाई होते! त्यापेक्षा संविधानाने दिलेल्या मार्गाने संघटित लढा देणे हाच खरा उपाय. मागासवर्गीय आयोगाच्या निकषांचा अभ्यास, मूलभूत अधिकार–कर्तव्यांचे वाचन–मनन, आणि शिस्तबद्ध संघर्ष यामुळेच न्याय मिळू शकतो. भुजबळ–पवार यांनी जसे सत्ता आणि संसाधनांचा वापर करून स्वतःची भूमिका मजबूत केली, तसे आपणही राजकीय शहाणपण अंगीकारायला हवे. भावनांच्या राड्यात शक्ती वाया घालवू नका—शिका, संघटित व्हा, आणि संविधानिक मार्गानेच हक्क मिळवा.

 अभिजीत राणे लिहितात

पीटर नवारो हा अगदीच संजय राऊत दर्जाचा माणूस सिद्ध झाला आहे. त्याने ट्रम्प आणि मोदीजी यांच्यात कलागत लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. टॅरिफच्या मुद्यावर मोदीजींनी मौन राखले, अनुल्लेखाने प्रत्युत्तर दिले, आणि हाच मोठा राजनैतिक प्रहार ठरला. अमेरिकन उद्योगजगताला तेव्हा समजले—भारताकडून गडबड झाली, तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. याच क्षणी एन्ट्री झाली सर्जियो गोरची—ट्रम्पसाठी डॅमेज कंट्रोलर. अमेरिकेतून गोर आणि भारतातून पीयूष गोयल यांनी संवादाचा पूल बांधायला सुरुवात केली. जॉन बोल्टनने स्पष्ट सांगितले की टॅरिफ हा एक मुद्दा आहे, पण अमेरिकेला भारताची गरज इतर अनेक जागतिक प्रश्नांवर आहे. एका वादामुळे संपूर्ण संबंध बिघडवणे शक्य नाही. नवारोचे विघ्नसंतोषी प्रयत्न निष्फळ ठरले. आता गोर भारतात येत आहे, आणि याचा अर्थ एकच—एडवांटेज इंडिया.

 अभिजीत राणे लिहितात

राऊतांचे भाकीत आणि वास्तवातील मोदींचा आवाज! संजय राऊत यांनी नेपाळचा हवाला देत भारतातही असंतोष आहे, अशी भविष्यवाणी केली. पण राऊतजी विसरतात की भारत आणि नेपाळ यात आकाश-पाताळाचा फरक आहे. इथे लोकशाहीचा पाया मोदींच्या मजबूत नेतृत्वावर उभा आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सत्तेवर अमेरिकन डीप स्टेटचे खेळ झाले असतील, पण भारतात जनता ठाम आहे. मोदींनी जेव्हा आवाज दिला, तेव्हा कोट्यवधी लोक ठामपणे त्यांच्या मागे उभे राहतात. विरोधकांना उचलून टाकणारी ताकद या जनसमर्थनात आहे. राऊतांना वास्तव हे पाहायचेच नाही. त्यांचे राजकारण नेहमीच भीती पसरवून चालते. पण भारतातील जनता नेहमी सकारात्मक, राष्ट्रहिताच्या भूमिकेत असते. म्हणूनच देशात गोंधळ नाही—स्थैर्य आहे, विकास आहे, आणि मोदींचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज. राऊतसाहेब, नेपाळच्या गोष्टींनी भारताला तोलू नका; कारण इथे जनता ठाम आहे, आणि तुमची भाकीते हवेतच विरतात.

 अभिजीत राणे लिहितात

गुप्ततेतच भारतीय सुरक्षा यंत्रणांचे यश ! सी आय ए , एफ बी आय , मोसाद , के जी बी , एम आय सिक्स यांच्यावर जगभरात कितीतरी पुस्तकं, सिनेमे आणि डॉक्युमेंटरीज बनल्या. त्यांच्या कारवाया जगासमोर आल्या. पण भारतीय सुरक्षा यंत्रणा? त्यांची नावे, त्यांचे नेटवर्क, त्यांची कार्यपद्धती फारशा कोणालाच माहीत नाहीत. आणि हेच त्यांच्या खऱ्या यशाचे गुपित आहे—गुप्तता. भारताची सुरक्षा यंत्रणा शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता काम करते. त्यांचे सहकारी आपल्या आजूबाजूलाच असू शकतात, पण ते स्वतःला कधीही उघड करत नाहीत. म्हणूनच भारत अनेक शत्रुराष्ट्रांच्या डाव्यांना रोखू शकतो, कितीतरी दहशतवादी कारवाया आधीच उधळू शकतो. जगभरात गाजणाऱ्या गुप्तहेर संस्थांना प्रसिद्धी हवी असते. भारतातील संस्थांना मात्र फक्त एकच ध्येय असते—राष्ट्राचे रक्षण. म्हणूनच त्यांचे काम चर्चेत येत नाही, पण त्यांचे अस्तित्वच भारताच्या सुरक्षिततेची हमी ठरते.

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page