🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 6
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कलकत्त्याच्या ममता बानो सरकारला बंगालच्या उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ममता बॅनर्जी यांचा उल्लेख बंगाल मधील हिंदुत्ववादी संघटना ममता बानो म्हणूनच करतात कारण त्यांचे वर्तन हे मुस्लिमांची कैवारी असणारी मुख्यमंत्री असेच आहे. त्या मुस्लिमांच्या कोणत्याही कार्यक्रमाला , निदर्शनांना मुक्त हस्ताने परवानगी देतात. त्यांनी रस्त्यावर घातलेला दंगा सहन करतात. परंतु हिंदू संघटनांनी दुर्गा पूजा करायची असेल तर मात्र ममता बॅनर्जी परवानगी नाकारतात. यावर्षी दुर्गा पूजा सुद्धा न्यायालयाच्या परवानगीनेच करणे शक्य झाले. त्याच प्रमाणे रामनवमी साजरी करण्यासाठी सुद्धा अंजनी पुत्र सेना या संघटनेला ममता बॅनर्जी प्रशासनाने परवानगी नाकारली होती. या संस्थेला न्यायालयात दाद मागून रामनवमी साजरी करण्याचा आदेश मिळवावा लागला. पश्चिम बंगाल मधील हिंदूंना आता तरी अक्कल येईल आणि या हिंदू द्वेषी ममता बॅनर्जी यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत अशी आपण आशा करू शकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. या फेलोशिपमुळे तरुणांना राज्यसरकारची कार्यशैली जवळून पहाता येईल , अभ्यासता येईल आणि सरकारी निर्णय प्रक्रियेचा भाग बनून काम सुद्धा करता येईल. त्यांना त्यांच्या मनातील अभिनव कल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठी शासनाची मदत होईल. एकंदरच सामान्य तरुणाई आणि शासन या संस्थांमध्ये परस्पर संवादाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अभिनव संकल्पना २०१४ साली सत्तारूढ झाल्यापासून अवलंबिली आहे आणि याची सकारात्मक फळे प्राप्त होत आहेत. तरुणांच्या उर्जेला या सकारात्मक मार्गाने विस्तारण्याचा हा प्रयास खरच स्पृहणीय आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तुत्वात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्रीलंका या देशाचा ”श्रीलंका मित्र विभुषण” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांनी प्रदान केला आहे. हा पुरस्कार प्रदान करताना दिसानायके यांनी भारत श्रीलंका यांच्या दीर्घकालीन बंधुत्वाच्या संबंधांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीत या संबंधांना कश्या प्रकारे पुन्हा उजाळा मिळाला यावर सुद्धा त्यांनी विस्तृत भाष्य केले. श्रीलंकेने काही वर्षांपूर्वी चीनच्या नादाला लागून त्यांचे हंबनटोटा हे बंदर त्यांनी त्यांना चालवायला दिले. चीनचे विस्तारीकरण धोरण आणि आपला देश गिळंकृत करण्याचे षडयंत्र त्यांच्या वेळीच लक्षात आले, दुसरीकडे श्रीलंका आर्थिक दृष्ट्या कोलमडला असताना चीनची गैरफायदा घेण्याची वृत्ती सुद्धा श्रीलंकन नागरिकान्च्या आणि नेत्यांच्या लक्षात आली. या सर्व परिस्थितीत मोदी सरकार श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणाने उभे राहिले. त्यांना आर्थिक पातभाळ प्रदान केले आणि आज श्रीलंका परत मार्गावर आला आहे. मोदींच्या या निरपेक्ष मदतीने श्रीलंका भारावून गेली आणि त्यांना भारताच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री पटली. श्रीलंकेने दिलेला हा पुरस्कार म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याची एक लोभस कृती आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वक्फ कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने एक खूप मोठी वैचारिक घडामोड होते आहे आणि याकडे अर्थातच आपल्या मीडियाचे बिलकुल लक्ष गेलेले नाही. वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार आणि दिसेल ती जमीन हडप करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे केवळ हिंदुच नाही तर ख्रिस्ती बहुल भागातील ख्रिस्ती नागरिक आणि संस्था सुद्धा संतापल्या होत्या. परंतु कायद्याच्या विचित्र स्वरूपामुळे त्यांना पण काहीच करता येत नव्हते. केरळात ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या समर्थनाच्या बळावर कम्युनिस्ट सरकार सत्ताधीश आहे. परंतु मुस्लिमांच्या वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी ते काहीच करत नसल्याने तिथल्या ख्रिस्ती जनतेचा मुखभंग झाला आहे. हा कायदा ज्या दिवशी दखल होणार होता त्याच दिवशी ख्रिस्ती संस्थांनी या विधेयकाला पाठिंबा घोषित केला होता. हा कायदा पारित झाला आणि ५० हून अधिक ख्रिस्ती नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भारताच्या उत्तर पूर्व भागात सुद्धा ख्रिस्ती नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत तिथेही भाजपाची सत्ता आहे, गोव्यात भाजपाची सत्ता आहे. केरळातील ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा जर भाजपाला साथ दिली तर पुढील निवडणुकीत केरळात भगवा फडकु शकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कांचा गच्चीबोवली इथल्या ४०० एकर जंगलासाठी तिथले स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी न्यायालयात जाऊन लढले आणि त्यांनी हे जंगल वाचवले. याच्या बरोब्बर उलट प्रकरण महाराष्ट्रात घडले होते. मुंबईतील आरे कॉलनी मधील जंगलात ख्रिस्ती लोकांना कब्रस्तानासाठी जागा हवी होती. राज्य सरकारने नकार दिला. मग ११७ झाडे मेट्रो कार शेड साठी कापली जाणार म्हणून आंदोलन पेटवले. समस्त मिडिया आणि सेलिब्रिटी मंडळी सामील झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले दोन्हीकडे राज्य सरकार जिंकले. मग स्वतःला मुंबईचे अनभिषिक्त सम्राट समजणारे ठाकरे पितापुत्र ही झाडे वाचवायला मैदानात आले. त्यांना मदत करायला बंगळुरू मधल्या ख्रिस्ती संस्थेने १० लाख ट्विट करण्याचा पराक्रम केला. पण फायदा झाला नाही. मग त्यांनी भाजपा साथ सोडून मुख्यमंत्रीपद मिळवून मेट्रो कार शेड ची जागा बदलण्याचा प्रयास केला परंतु न्यायालयाने त्यांना जुमानलेच नाही. पण या सगळ्या अहंकाराच्या आहारी जाऊन आणि सुपारी घेऊन लढण्याच्या उपद्व्यापांची किंमत मुंबईच्या जनतेने प्रकल्पाला दोन वर्षांचं उशीर आणि काही शे कोटींचा चुराडा अशी चुकवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडगोळीच्या नवीन प्रेषितांच्या सरकारने तेलंगणा मध्ये ४०० एकर जमीन साफ करायला घेतली पण यांना कंठ फुटला नाही.
🔽





Comments