स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
- dhadakkamgarunion0
- 9 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
● महाराष्ट्र राज्य सध्या प्रगतीच्या एका नव्या टप्प्यावर असून, विविध क्षेत्रांमध्ये देशात आपला वेगळा ठसा उमटवत आहे. राज्याच्या विकासाचा हा वेग अधिक वाढवण्यासाठी शासन आता नामवंत स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र येऊन काम करणार आहे. या भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठे बदल घडून येतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने टाटा ट्रस्टसोबत १२ आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनसोबत १ महत्त्वपूर्ण करार केला आहे. या भागीदारीमुळे शिक्षण, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रातील योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थांचे तंत्रज्ञान आणि अनुभव मोलाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जलयुक्त शिवार' सारख्या मोहिमेला या भागीदारीमुळे मोठी ताकद मिळणार असून, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments