top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 25
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

1971 साली भारताने बांग्लादेश निर्माण करताना 93,000 पाकिस्तानी सैनिक शरण आणले होते आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला इथे शांतता चर्चा सुरू झाली. तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यासमोर इंदिरा गांधी यांनी 93,000 शरण आलेल्या सैनिकांचा मुद्दा मांडला त्यावर भुट्टो यांनी त्यांना तुम्हीच ठेवून घ्या मला त्यांची गरज नाही असे स्पष्ट संगितले. इंदिरा गांधी यांच्यासाठी हा खूप मोठा मानसिक धक्का होता आणि त्यामुळे पुढील चर्चेत त्यांना जेते राष्ट्र असूनही आपल्याला हव्या त्या गोष्टी घडवता आल्या नाही कारण त्या 93,000 सैनिकांना पोसण्याचे ओझे त्यांच्या डोक्यावर ठेवले होते. याचा परिणाम असा झाला की युद्ध जिंकूनही भारत वाटाघाटीच्या टेबलावर सपशेल पराभूत झाला. कश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे यावरील सहमती आणि 93,000 सैनिक परत घेण्यास भुट्टो यांनी दिलेली मान्यता हाच इंदिरा गांधी यांच्यासाठी मोठा विजय होता. पण या धांदलीत पाकिस्तानच्या ताब्यात असलेले आपले युद्ध कैदी परत घेण्याचे भान सुद्धा इंदिरा गांधी यांना राहिले नाही. एखाद्या देशाचा पंतप्रधान आपल्याच लाखभर सैनिकांना असे वार्‍यावर सोडू शकतो हे खरोखर अशक्य असे कटू सत्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पुणे जिल्ह्याच्या साधारण दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या इस्राईल ला ४० किलोमीटर असणाऱ्या गाझा पट्टीच्या बाजूने ७ ऑक्टोबर २०२३ ला झालेल्या हल्ल्याला निष्प्रभ करायला जवळपास ६ तास लागले. काल जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी रस्त्याने पोहोचायला अर्धा तास लागतो, सर्वात जवळचे हॉटेल म्हणजे मानवी वस्ती ही ४० मिनिटांच्या अंतरावर आहे.त्या परिसरात अत्यंत घनदाट असे जंगल आहे.हल्ला झाल्याची बातमी कळल्यावर सैन्याची तुकडी तिथे अर्ध्या तासात पोहोचली होती.तिने दोन अतिरेकी जागीच मारले,लपलेल्या उर्वरित दोन अतिरेक्यांचा मागोवा याच ड्रोन च्या इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे अत्यंत अचूकपणे काढण्यात आला. अशा दुर्गम ठिकाणी भारताचा प्रत्युत्तर काळ हा इस्राईल पेक्षाही वेगवान होता. अतिरेक्यांचे लक्ष्य हे मोदी होते, मात्र ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द झाल्याने हे दुसरे लक्ष्य आयत्या वेळेला सांगितले गेले असावे. सुधारित हल्ला करण्याचे लक्ष्य हे आयबी चे अधिकारी होते ज्यांनी गाफीलपणे कदाचित स्वतःचे ओळखपत्र दाखवून हॉटेल मध्ये रूम बुक केली असावी. ज्यामुळे हॉटेलमालक ते टॅक्सीवाले यांच्यामार्फत अतिरेक्यांना त्यांचे ठिकाण कळाले असावे असा अंदाज आहे. या शिशुपालाचे १०० अपराध भरलेत, देशातीलही असंख्य शिशुपालांचा या निमित्ताने निकाल लावला गेला पाहिजे ही इच्छा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ज्या पद्धतीने पाकिस्तानी अतिरेक्यांनी हिंदूंना नाव विचारून गोळ्या घातल्या आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरातली जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे आणि त्यामुळे कट्टर म्हणवले जाणारे मुस्लिम नेते सुद्धा हादरले आहेत. कारण संतापलेल्या हिंदूंनी बहिष्कार शस्त्र उपसले तर ते मुस्लिम समाजाला खूप जड जाऊ शकते याची त्यांना कल्पना आहे त्यामुळे एरवी आक्रस्ताळे बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे ओवेसी आणि अबु आजमी यांच्यासारखे नेते अत्यंत जबाबदारीने बोलताना आणि या हत्याकांडाचा निषेध करताना दिसले. कोंग्रेस पक्षाचे नेते शशी थरूर आणि राहुल गांधी यांनी सुध्दा डोके जागेवर ठेवून प्रतिक्रिया दिली. रोबर्ट वढेरा यांनी भाजपावर टीका केली यात नवल नाही कारण त्यांचा सध्या एक पाय तुरुंगात आहे आणि दूसरा कधीही जाऊ शकतो अशी स्थिती आहे. याउलट घराणेशाही वाल्या पक्षांचे उथळ संपादक उर्फ सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा, आपल्या डफली गॅंग पुरोगामी संपादक आणि पत्रकारांच्या जोडीला बसून या हत्याकांडाला भाजपा कसा जबाबदार आहे छाप अत्यंत संतापजनक टवाळी करताना दिसले.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वात मोठा फटका जम्मू काश्मीर मधील सामान्य मुस्लिमांना बसणार आहे. गेली कित्येक वर्षे दहशतवादाने होरपळणार्‍या जम्मू आणि काश्मीर मधील सामान्य मुस्लिमांना सैन्यावर दगडफेक करून मिळणार्‍या 500 रुपयांच्या नकली नोटा हाच एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत होता. परंतु 370 कलम रद्द झाले आणि पर्यटकांचा ओघ वाढला. स्थानिक मुस्लिमांना रोजगार मिळाला. खिशात चार पैसे खेळू लागले. समृद्धी आली. परंतु या हल्ल्याने आता पर्यटन उद्योगाला कमीत कमी 6 महिन्यांचा तरी दणका बसणार आहे. एप्रिल , मे , जून हे तीन कमाईचे महीने असतात. याच काळात पर्यटक न येणे ही खूप जास्त वेदनादायी गोष्ट सिद्ध होणार आहे. त्यामुळे पहलगाम मधील सामान्य मुस्लिम हबकले आहेत. त्या भागातील 99 % लोक पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यटक न येणे म्हणजे अक्षरशः उपाशी मरण्याची वेळ येणे आहे हे ते जाणून आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अत्यंत अभिरुचीहीन , समाज विघातक , पराकोटीचे घाणेरडे आणि असंस्कृत बोलणार्‍या लोकांची संख्या प्रचंड वाढते आहे. न्यायालये जाणीवपूर्वक असे काहीही बोलणार्‍या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली मोकाट सोडत असल्याने आणि प्रचलित कायदे अत्यंत संदिग्ध आणि पोकळ असल्याने समाजातील या वाढत्या विकृतीला नियंत्रणात ठेवणे अशक्य होऊन बसले आहे. अश्या पद्धतीचे अत्यंत आक्षेपार्ह वर्तन सामान्य माणसाने केले तर आपण त्याला मूर्ख समजून सोडून देऊ शकतो परंतु राजकीय नेते , मोठे सेलिब्रिटी , विचारवंत मंडळी जाणीवपूर्वक एखाद्या घटनेवर असभ्य , असंवेदनशील आणि अमानवी भूमिका घेत असतील तर या प्रवृत्तीला ठेचणे आवश्यक आहे आणि यासाठी अत्यंत कठोर कायदे केले जाणे आवश्यक आहे. सध्या शांतता कालखंड सुरू आहे म्हणून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चाळे आपण सहन करतो आहोत परंतु भविष्यात युद्ध सुरू झाले आणि तरीही हे लोक असेच नकारात्मक वर्तन करू लागले तर त्यातून खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page