top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 19
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठे करण्याचे भाजपाचे धोरण त्यांना सातत्याने तरुण व तडफदार नेत्यांची फौज तयार करून देते आणि त्यामुळे त्यांना घराणेशाहीच्या दिवट्यांना डोक्यावर घेण्याची गरज पडत नाही. रविंद्र चव्हाण हे असेच एक कार्यकर्ते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी उपजिल्हाध्यक्ष पदापासून केली आणि नंतर तब्बल चार वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही सेवा बजावली आहे. रविंद्रजींच्या नेतृत्वाखाली, भाजपने कोकण विभागात महायुतीच्या विजयासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या आजवरच्या कारकि‍र्दीला न्याय देण्यासाठीच त्यांची १२ जानेवारी २०२५ रोजी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार पाहू लागतील. सावरकर प्रेमी अशी त्यांची ख्याति असून त्यांनी डोंबिवली आणि परिसरात अत्यंत अभिनव उपक्रम राबवत सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. पुढील वर्षी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पुरेसे आधी त्यांच्याकडे प्रमुखपद येणार असून या निवडणुकांमध्ये भाजपाची कामगिरी सर्वोत्तम व्हावी ही त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र भाजपा बहुदा एकला चलो रे या न्यायाने लढणार असल्याने ही जबाबदारी अधिकच मोठी होते. त्यांच्या कारकिर्दीला आमच्याकडून शुभेच्छा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

हर्षवर्धन सपकाळ नावाचे सद्गृहस्थ कोंग्रेस पक्षाने आपल्या महाराष्ट्र शाखेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले. कोंग्रेस ची महाराष्ट्रातील अवस्था दयनीय असल्याने त्यांची कोणीही दखलच घेतली नाही. अश्या अदखलपात्र प्रदेशाध्यक्ष महोदयांनी आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अभिरुचीहीन मार्ग निवडला. अर्थात कोंग्रेस पक्षाच्या परंपरेला अनुसरून त्यांनी अश्लाघ्य पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे औरंग्जेबाप्रमाणे वर्तन करत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांच्यावर टिकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी अश्या पद्धतीने विखारी टीका करून आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील कोंग्रेस पक्ष सुद्धा केंद्रातील त्यांच्या युवरजाप्रमाणे वर्तन करून राजकीय मतभिन्नता ही शत्रूत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवणार असल्याचे उघड झाले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आपल्या देशातील पोलिस खात्याला मुसलमान मंडळींच्या बद्दल अनाकलनीय प्रेम असते. वास्तवात पोलिसांवर हल्ला करणारी एकमेव जमात म्हणजे मुसलमान आहेत तरीही मुस्लिमांशी भाईचारा करण्याची पोलिसांना प्रचंड हौस असते. मरकज- ए – फलाह आणि नेरूळ पोलिस ठाणे यांनी १८ तारखेला इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यासाठीच्या पत्रकात पोलिसांचा अधिकृत लोगो वापरला होता. पोलिसांचे लोगो वापरच्या संदर्भातील १९५० सालच्या कायद्यानुसार कलम ३ आणि पाच च्या अनुसार हे बेकायदेशीर कृत्य असून संबंधितांना शिक्षा सुद्धा होऊ शकते. या विषयाला सामान्यांनी वाचा फोडल्यावर आणि १७ तारखेला संध्याकाळी त्यांचेच धर्मबांधव नागपुरात पोलिसांना दगडांनी ठेचल्याची व पोलिस उपायुक्तांच्या अंगावर कुर्‍हाडीचे घाव टाकल्याची बातमी आल्यावर सदरील ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांचा अंतरात्मा जागा झाला आणि त्यांनी सदरील इफ्तार पार्टी रद्द केल्याची घोषणा केली. या प्रकरणात जारी माघार घेतली गेली असली तरी पोलिसांच्या लोगोचा गैरवापर केळ्याचे सिद्धा झाले असल्याने शासनाने संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बिगर भाजपा राजवटी या हिंदूंवर अत्याचार करतात आणि असे करण्यात त्यांना भूषण वाटते हे वारंवार उघड होते आहे आणि देशभरातली हिंदूंनी याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक होऊन बसले आहे. आंध्रपरदेशात मध्ये ख्रिस्ती जगनची राजवट होती त्यावेळी तिरुपति देवस्थानवर त्याने चक्क ख्रिस्ती नागरिकांना विश्वस्त बनवले होते. इतकेच नाही तर त्यांनी तिरूपतीचा प्रसादाचा लाडू जनावरांची चरबी वापरुन बनवला आणि वाटला. कर्नाटकात मुस्लिमांना कंत्राटदार म्हणून सुद्धा आरक्षण लागू केले आहे. जोडीला मुस्लिम मुलींच्या लग्नासाठी सरकार पन्नास हजार रुपयांची खैरात वाटत आहे. झारखंडमध्ये सोरेन सरकार च्या आशीर्वादाने तिथले धर्मांध प्रचंड माजले आहेत. होलीच्या निमित्ताने झारखंड मधील हिंदूंनी एक शोभयात्रा काढली. धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर प्रचंड मोठ्या संख्येने हल्ला केला. दगडफेक केली. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले आहे. झारखंड च्या आदिवासी पट्ट्यात जमिनीची मालकी ही मुलींच्याकडे असते. तशीच परंपरा आहे. याचा लाभ घेत झारखंड मधील मुसलमान जमीन असणार्‍या मुलींशी लग्न करून त्यांच्या माध्यमातून जमीन जिहाद चालवत आहेत आणि त्याला सोरेन सरकारचे अभय आहे. हा घटनाक्रम अत्यंत चिंतित करणारा असून केंद्र सरकारने यात लक्ष घालणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे भारतात आले असताना दिल्ली मध्ये दंगल पेटवली गेली. या दंगलीतील मुख्य आरोपी बांगलादेशी आणि आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहिर हुसेन हा होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गेब्बार्ड या भारतात आल्या असताना काल नागपूर दंगल पेटवली गेली. हे निश्चितच योगायोग नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. दिल्ली दंगल आणि नागपुर दंगलीचा हा सर्वात महत्वाचा इशारा आहे. गेल्या काही वर्षांपासून रामनवमी आणि गुढीपाडव्याला निघणार्‍या हिंदूंच्या शोभायात्रांवर, दगडफेक होण्याचे प्रकार देशाच्या अनेक शहरांमध्ये घडत आहेत. आता क्रिकेटमध्ये भारताला मिळालेल्या दणदणीत यशानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवरही हल्ला झाला आहे, यावरून हिंदू आणि भारतविरोधी घटकांनी देशात हिंसाचाराचा कट आखल्याचे स्पष्ट दिसते. ज्या राज्यात काँग्रेस किंवा भाजपविरोधी पक्षांची सरकारे आहेत, तेथेही अशा प्रकारच्या हिंदू जमावावर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने या घटनेकडे एक राष्ट्रीय पातळीवरील षडयंत्र या दृष्टीने बघून अत्यंत कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page