top of page
Search


सध्या केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाचे आणि चर्चेचे विषय आव्हान स्वरुपात उभे आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* सध्या केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाचे आणि चर्चेचे विषय आव्हान स्वरुपात उभे आहेत. राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरील प्रश्न, न्यायव्यवस्थेशी संबंधित "झुरळ पार्टी" वाद, NEET परीक्षा व्यवस्थेवरील टीका, UGC नियमावलीवरील असंतोष आणि इथेनॉल मिश्रण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित होत असलेल्या शंका यामुळे सरकारची कसोटी लागणार आहे. यापैकी काही प्रश्न थेट सरकारी धोरणांशी संबंधित आहेत, तर काहींमध्ये प्रशासनाची भूमिका आणि उत्तरदायित्व यावर चर्चा होत आहे.


मेहबूबा मुफ्ती यांना सध्या भारत पाक दोस्तीचा पूल बांधण्याचे डोहाळे लागले आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मेहबूबा मुफ्ती यांना सध्या भारत पाक दोस्तीचा पूल बांधण्याचे डोहाळे लागले आहेत. पण हा पूल आधीच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बाजूने तुटलेला आहे, हे त्यांना दिसत नाही. PoK मधील सामान्य नागरिकांवर होणारे अत्याचार, दहशतवादी कारवाया, पेहलगामसारखे हल्ले—याकडे त्यांचे डोळे मिटलेले आहेत. दोस्तीच्या गोड गप्पा तेव्हाच शक्य होतील जेव्हा PoK भारतात येऊन जम्मू काश्मीरचा भाग बनेल. तोपर्यंत "ऑपरेशन सिंदूर" हाच खरा पूल आहे—मजबूत, सुरक्षित आणि राष्ट्रीय हिताचा.
bottom of page