मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सौर उर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे देशात सर्वोत्कृष्ट काम
- dhadakkamgarunion0
- Apr 25
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सौर उर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे देशात सर्वोत्कृष्ट काम
● शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२५ वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांना १०० दिवसाला ६९० मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना ७४६ मेगावॅट सौर उर्जा निर्मिती करण्यात आली असून यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण केला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी विकासकांना वन, पर्यावरण, सुरक्षेबाबतच्या अडचणी असल्याने त्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सौर उर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक कामात अडचणी आणत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments