बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
- dhadakkamgarunion0
- Jul 6
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकांसोबतचे 'मधुर' संबंध. आता रीना आणि किरण दोघी मिळून नव्या गौरीला 'आमीरला खुश ठेवण्याचे' प्रशिक्षण देतील, अशी चर्चा आहे. एका लग्नात १६ वर्षांचा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहता, गणितीय तर्कानुसार आमीर २०४२ मध्ये तिसरा घटस्फोट घेईल आणि विवाहाचा 'चौकार' मारण्यासाठी २०४९ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी चौथे लग्न करेल! वय बदलले, शतके बदलली, पण आमीरचा हा विवाह-यज्ञ काही थांबायला तयार नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
खड्डेयुक्त रस्ते, बेशिस्त वाहतूक, कर्कश्य हॉर्न, गुटखा थुंकणारे लोक आणि कचऱ्याचे ढीग हेच आपल्या रोजच्या जगण्याचे वास्तव आहे. आपण कागदावर 'माणुसकी' आणि 'संस्कृती'च्या गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात समाज म्हणून आपण प्रचंड अपरिपक्व आणि बेशिस्त आहोत. सुमार आरोग्य यंत्रणा, भ्रष्ट कायदेव्यवस्था आणि खालावलेला शैक्षणिक दर्जा यामुळे सामान्यांचे जिणे असह्य झाले आहे.पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या नावाखाली माणसांपेक्षा हिंस्र प्राण्यांना जास्त महत्त्व दिले जाते, तर दुसरीकडे बेसुमार जंगलतोड आणि अनधिकृत बांधकामे राजरोस सुरू आहेत. एसटी महामंडळाच्या महिला सवलतीसाठी 'एनसीएमसी' कार्डाची सक्ती करणाऱ्या बिनडोक सरकारी नियमांमुळे प्रशासकीय नाकर्तेपणा उघडा पडतो. शिस्त आणि स्वच्छतेचा तिटकारा असलेल्या आपल्या या व्यवस्थेत, समाज म्हणून आपण स्वतःच्याच नालायकपणाचे दर्शन घडवत आहोत, हे नाकारता येत नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणातील आरोपी टिन्नू यादवचे अखिलेश यादव यांच्याशी असलेले कथित संधान आणि चंपत राय यांच्याशी वाढलेली जवळीक केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरती मर्यादित नाही, तर तो मंदिराच्या सुरक्षेला लागलेला मोठा सुरुंग आहे. व्हीआयपी पासेसचा गैरवापर करून मंदिराची रेकी तर झाली नव्हती ना, याचा शोध घेणे आवश्यक आहे. राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जवळ करणे देशाला महागात पडू शकते. महाराष्ट्रात दाऊदशी आर्थिक संबंधांचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांच्याशी केलेली तडजोड आणि त्यांच्या कन्येचा इस्लामी अजेंडा हे याचेच दुसरे उदाहरण आहे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर उभे राहिलेले राम मंदिर हे शत्रूच्या डोळ्यात खुपणारे केंद्र आहे. अशा संवेदनशील स्थानी संत प्रवृत्ती ऐवजी चाणक्यासारखी चतुर सुरक्षा व्यवस्था हवी. सुदैवाने केवळ पैसा लुटला गेला, पण भविष्यातील मोठ्या घातपाताचा कट टाळण्यासाठी आतातरी गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
केंद्रातील मोदी सरकारने E20 (२०% एथेनॉल मिश्रित) पेट्रोल सक्तीचे करून ₹८५,००० कोटींचे परकीय चलन वाचवल्याचा दावा केला असला, तरी या धोरणाने देशातील २५ कोटी वाहनधारकांच्या इंजिनची वाट लावली आहे. २०२२-२३ पूर्वीची ८०% वाहने शुद्ध पेट्रोलसाठी डिझाइन केलेली असताना, कोणतीही दीर्घकालीन चाचणी न घेता त्यांच्यावर हे घातक इंधन लादण्यात आले. यामुळे वाहनांचे कार्बोरेटर चोक होणे आणि गंज लागण्याच्या समस्या वाढल्या आहेत. अवघ्या ₹६०-६५ प्रति लीटर मिळणारे एथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून तेल कंपन्या अतिरिक्त नफा कमावत आहेत, तर सरकार पूर्ण कर वसूल करत आहे. याउलट, १ लीटर एथेनॉलसाठी ३,००० लीटर भूजल सुकवले जात असून, प्रदूषण २४% वाढल्याचे जागतिक अहवाल सांगतात. आधीच्या सरकारांनी मंदीतही शुद्ध इंधनाची हमी दिली; परंतु आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असूनही सक्तीच्या भेसळीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला दुहेरी फटका बसत आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
तामिळनाडूतील तंजावुर येथील 'अभीष्ट वरदराजपेरुमल' मंदिरात स्वतःला हिंदू मानणाऱ्या एका अमेरिकन महिलेला प्रवेश नाकारल्याची घटना आणि त्यावर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लॉरा फ्रान्सिस अय्यंगार या महिलेला 'अमेरिकन ख्रिश्चन' संबोधून मंदिर प्रशासनाने केवळ बाह्य आवारातच रोखले होते. याविरोधात न्यायालयाने तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स (HR&CE) विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जर ती नियमांचे पालन करत असेल, तर तिला हिंदू भाविकाप्रमाणेच सर्व हक्क मिळायला हवेत. हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा हक्क बहाल करणारा नाही, तर सनातन धर्माच्या व्यापकतेची आणि सर्वसमावेशकतेची साक्ष देणारा आहे. केवळ जन्म किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारे कोणाची श्रद्धा नाकारणे चुकीचे आहे. प्रशासनाने संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून धार्मिक नियमांची अंमलबजावणी करताना मानवी हक्क आणि खऱ्या श्रद्धेचा आदर राखायला हवा, हेच न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
🔽









Comments