top of page

जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार

  • dhadakkamgarunion0
  • Apr 27
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे जीवनमान सुकर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘कॉर्पोरेट’च्या धर्तीवर मूल्यांकन करण्याचे ठरवले आहे. कॉर्पोरेटमध्ये केआरए पद्धत असते त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल. शासनाच्या धोरणात्मक उपाययोजनांमध्ये सामान्य नागरिकांच्या गरजा समजून घेणे व त्यानुसार प्रशासनाच्या प्रक्रिया सुधारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फडणवीस यांच्या निर्देशानुसार महसूली विभागस्तरावरील प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक, अशा एकूण विषयवार ६ अभ्यास समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या समित्यांची प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे प्रशासनाच्या विविध स्तरांवर विद्यमान कार्यपद्धती, योजनांची प्रभावीता, कामकाज पद्धती व माहिती व्यवस्थापन प्रणाली यांचे सखोल मूल्यांकन करून, सुसंगत आणि सुधारीत उपाययोजना सुचवणे असा आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page