आता १५० दिवसांचा कृती आरखडा; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- May 8
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आता १५० दिवसांचा कृती आरखडा; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित १५० दिवसांचा दुसरा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील १२ हजार ५०० शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील ४८ विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील ९०२ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे १५० दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments