top of page

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

  • dhadakkamgarunion0
  • Oct 17, 2025
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

“फडणवीसांची हरित क्रांती — बांबूपासून उद्योगक्रांतीकडे” महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा दाखवणारा निर्णय म्हणजे ‘बांबू उद्योग ध्येयन २०२५’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम केवळ कृषी नाही तर हरित उद्योगक्रांतीचा पाया ठरत आहे. ₹५० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून पाच लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणे, १५ स्मार्ट बांबू क्लस्टर्स उभारणे आणि शाश्वत उत्पादनाला चालना देणे — ही विकासाची सर्वंकष संकल्पना आहे. ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक संघटना, कचरा शेती, ऊर्जा व घरगुती क्षेत्रात बांबूच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्धार हा फडणवीस यांच्या ‘लोकल टू ग्लोबल’ दृष्टिकोनाचा परिपाक आहे. पर्यावरण, रोजगार आणि उद्योग — या तिन्हींचे संतुलन साधणारा हा आराखडा महाराष्ट्राला आत्मनिर्भरतेकडे नेणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

खोट्या केसेस आणि राजकीय सूडाचा आहेर! दारू घोटाळ्याच्या प्रकरणात 'आप' नेत्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांची पोलखोल न्यायालयात सुरूच आहे. ईडीकडे कसलाही ठोस पुरावा नसल्याने सुनावणी टाळण्यासाठी त्यांनी ९ वेळा कोर्टात बहाने केले, हे सारे चित्र सांस्कृतिक आणि राजकीय अधोगतीचे निदर्शक आहे. केवळ राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी खोट्या केसेस दाखल होतात, हे चुकीचे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना तडा देणारे ठरते. न्यायालयात पुराव्याअभावी आरोप सिद्ध होत नाहीत, यावरून हे सर्व राजकीय षडयंत्रच असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी खोट्या केसेस करणाऱ्यांना कडक शिक्षा आणि अजामीनपात्र गुन्ह्यात तुरुंगवासाची तरतूद अत्यावश्यक आहे, नाहीतर राजकारण ह्या देशातील निष्पाप नागरिकांचा छळ तसाच सुरू राहील.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

राज ठाकरे इंडिया आघाडी फोडणार ? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चेमुळे इंडी आघाडीत असंतोषाची लाट उठली आहे. काँग्रेस अध्यक्ष सपकाळ यांनी दिल्लीला राज ठाकरे यांना इंडी आघाडीमधून दूर ठेवण्याचा आग्रह दर्शवला, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. यदाकदा उद्धव ठाकरे यांनी राजसाहेबांना सामील करण्यावर जोर दिला, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा इशारा देत आहे. हे वाढते मतभेद आधुनिक महाराष्ट्रातील विरोधी राजकारणासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. महत्त्वाचे असे की, विरोधी एकजूट भंगली तर भाजपाला अप्रत्यक्षपणे फायदा होईल. परिणामी, मतांनी विभागणी होईल आणि सत्ता समीकरणे बदलू शकतात. इंडी आघाडीचा निर्णय समन्वयावर आणि परिपक्व राजकीय संवादावर असायला हवा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

मुस्लिम मतांचं राजकारण—नितीश कुमार माघार घेत आहेत का? बिहारमध्ये निवडणुकीचं चित्र बदलतंय. प्रशांत किशोर यांनी मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य दिलंय, तर ओवेसी, स्वामी प्रसाद मौर्य आणि चंदू रावण यांची आघाडी मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करत आहे. मागील निवडणुकीत ओवेसींचे सहा आमदार निवडून आले होते—यावेळी आकडा वाढू शकतो. दुसरीकडे, NDA ने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत एकही मुस्लिम नाही. नितीश कुमार यांनी मागच्या वेळी ११ मुस्लिम उमेदवार दिले होते, पण सर्व अपयशी ठरले. त्यामुळे यंदा त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणातून माघार घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मुस्लिम मतदारांमध्ये वाटेकरी अनेक आहेत, पण त्यांचं प्रतिनिधित्व कोण करणार? बिहारच्या राजकारणात मुस्लिम मतांचं गणित पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे, आणि नितीश कुमार यांची भूमिका आता नव्या समीकरणांतून तपासली जाईल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

निवडणूक आणि नैतिकतेचे सवाल. रामपूरचे सपा खासदार मोहिबुल्लाह नदवी यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील वर्तणूक गंभीर चर्चा चर्चेचा विषय आहे. राजकीय नेतेपदासाठी केवळ धार्मिक मोअज्जिम असणे इतकीच पात्रता आणि वारंवार विवाह, तसेच पत्नींच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे हे अखिलेश यादव यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. या नदवींच्या चौथ्या पत्नीला न्यायालयाने दरमहिना ₹३०,००० भत्ता द्यावा असा आदेश दिल्यावरही त्यांनी पैसे न देणे, तसेच संपत्ती कुर्कीचे आदेश होईपर्यंत कर्ज न फेडणे, हे लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेल्या जबाबदारीच्या पूर्ण विरोधात ठरते. राजकीय पक्ष नेतृत्वाने मतांच्या लांगूलचालनासाठी टिकिट देणे, विरोधकांचा विरोध असूनही खासदारपद मिळणे, आणि पत्नीने न्यायालयाड दाद मागणे हा लज्जास्पद घटनाक्रम आहे. निवडणूक प्रक्रियेत सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचेही भान ठेवणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्व केवळ धार्मिक प्रतिष्ठा, पद किंवा संख्येवर ठरत नाही—ते सामाजिक नैतिकतेवर आधारित असावे लागते. परंतु हे अखिलेश यादव यांना कोण सांगणार ? त्यांना तर आजम खानला पर्यायी चेहरा उभा करायचा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहीतात

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती की खांडेकर यांनी महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामाशी संबंधित थकीत बिलांच्या मंजुरीसाठी १० लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारीनंतर, एसीबीने संतोष खांडेकर यांच्या निवासस्थानी सापळा रचला आणि गुरुवारी खांडेकर यांना मागणी केलेली रक्कम स्वीकारताना पकडले गेले.

त्यानंतर काही वेळातच, एसीबीच्या पथकाने खांडेकर यांना त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतले.

सध्या जालना एसीबी कार्यालयात त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

एसीबीचे अधिकारी संबंधित कागदपत्रे, कॉल रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे तपासत आहेत.

दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात धक्का आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर, एसीबीने या प्रकरणाचा पुढील तपास जलद गतीने सुरू केला आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page