🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- May 8
- 4 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पहलगाम हल्यानंतर आणि आता ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा कोंग्रेसच्या नेत्यांची जी अपरिपक्व वक्तव्ये येत आहेत त्यातून ते पाकिस्तानचे स्लीपर सेल आहेत का ? असा प्राशन निर्माण होतो. रॉबर्ट वाड्रा: अतिरेक्यांनी हिंदूंना धर्म विचारून यासाठी मारले. कारण मुस्लिमांना इथे दाबले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या: पाकिस्तान सोबत युद्ध करण्याची मुळीच गरज नाही. पहेलगाम हल्ल्यासाठी सर्वस्वी सुरक्षा व्यवस्थाच जबाबदार आहेत. सुरेश वडेट्टीवार: आतंकवादाला धर्म नसतो. आणि धर्म विचारून मारायला अतिरेक्यांकडे वेळ होताच कुठे.बी के हरिप्रसाद: मुळात पाकिस्तान आपला शत्रूच नाही. आर बी तिम्मापुर: कुणी काय धर्म विचारून गोळ्या मारत असतो का..??मणिशंकर अय्यर: फाळणी नंतर न सुटू शकलेल्या प्रश्नांचा हा परिपाक आहे. तुम्ही सिंधू पाणी करार कसा काय समाप्त करू शकता..??राहुल गांधी: माझी आजी असती तर, आत्तापर्यंत सुड घेऊन मोकळी झाली असती. ऑपरेशन सिंदूर नंतर रत्नाकर महाजन हे कोंग्रेस प्रवक्ता म्हणाले, मोदी म्हणत आहेत दहशतवाद्यांवर हल्ले केले मग त्या मसूद अजहर चे कुटुंब कसे मारले गेले ? कोंग्रेसची ही भूमिका देशद्रोही आहे आणि तिचा निषेध करावा तितका थोडा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजपाचे आमदार यांच्यात संवादाचा किती मोठा अभाव आहे हे दर्शवणारे एक प्रकरण नुकतेच उघडकीला आले. अक्कलकुवा येथील जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम या संस्थेचे चेअरमन गुलामअली वस्तावनी व त्याचा मुलगा हुजेफा वस्तावनी हे मदरसा चालवण्याच्या जोडीला बांगलादेशी आणि अन्य देशातील नागरिकांना भारतात सेटल करण्याच्या दृष्टीने सर्व मदत करत होते. त्यांनी या मंडळींना आधार कार्ड, रेशन कार्ड , मतदाता ओळखपत्र असे सगळे मिळवून देण्यासाठी स्वतःचे वजन खर्च केले. या बाप लेकांच्या उचपाती माहिती असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतात आणि याच सदगृहस्थांचे निधन झाल्यावर भाजपचे 1-2 नाही तब्बल 19 आमदार आपल्याला कसे दुःख झाले आणि त्यांच्या मृत्यूसंदर्भात खेद प्रकट करणारे निवेदन सोशल मीडियावर टाकताना “शिक्षणमहर्षी हजरत मौलाना गुलाम वस्तानवी यांचे निधन ही एक अत्यंत क्लेशदायक, हृदयद्रावक आणि अपूरणीय क्षती आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी सहज भरून निघणारी नाही.” या शब्दात स्तुति समने उधळतात. आमदारच अश्या लोकांना पाठीशी घालणार असतील तर महाराष्ट्रात घुसखोरांना कोण पकडणार ?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आरिफ अज़ाकिया,जे पूर्वी कराची चे मेयर होते ते सध्या इंग्लंड मध्ये रहात असून भारत- पाकिस्तान संबंध या विषयावर पाकिस्तानात होणाऱ्या चर्चांत नियमितपणे सहभागी होत असतात. त्यांनी पहलगाम हत्याकांडानंतर दोन देशांत निर्माण झालेल्या तणावाबद्दल एका व्हिडिओमध्ये बोलताना एक अत्यंत वेगळे आणि महत्वाचे भाष्य केले. ते म्हणाले की त्यांचा जगभरातील विविध देशांतील नागरिकांशी नित्य संपर्क असतो. जागतिक पातळीवर पहलगाम हल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध होईल या बद्दल संशय नाही. आधीची सरकारे असती तर युद्ध झाले नसते परंतु नरेंद्र मोदी मात्र पाकिस्तानला अद्दल घडवतील याबद्दल जागतिक पातळीवर एकमत आहे. त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे भारत व पाकिस्तानात यांच्यातील संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे पाकिस्तानचे २४ कोटी लोक घाबरून गेले आहेत मात्र एक ही भारतीय घाबरलेला नाही. उलट समस्त भारतीयांना आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवणे आणि पाकिस्तानचे चार तुकडे करण्याची इच्छा असल्याचे दिसून येते आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या नवीन भारतात आता खरोखर ही विजिगीषू वृत्ती निर्माण झाली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जागतिक पातळीवरील संस्थांनी खुलासा केला आहे की चीन जगातील सर्व देशांतील विरोधी पक्षांतील नेत्यांना त्यांच्या त्यांच्या देशात अस्थिरतेचे वातावरण बनवण्यासाठी शेल कंपन्यांद्वारे खुप पैसा पुरवत आहे.मालदीव, म्यानमार, नेपाल, बांग्लादेश, युगांडा, तंजानिया, इथोपिया, सोमालिया ह्या देशात जे काही होत आहे ते चीनच्या इशाऱ्या वरच होत आहे आणि अजुन खूपसारे देश चीनचा रडारवर आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून भारतात सर्व राजकीय आंदोलने सुरू आहेत, त्याला आर्थिक पाठबळ चीन देतो आहे. काँग्रेस आणि चीन एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याचा त्यांनी करार केला आहे. म्हणून कोंग्रेस सत्तेत यावी यासाठी चीन पैसे ओततो आणि चीन चे भारतातील हितसंबंध बाधित होऊ नये म्हणून कोंग्रेस मदत करते असे हे साटेलोटे आहे. काँग्रेस आणि चीन चे लागेबांधे आतापासून नाहीयेत तर नेहरूचा काळापासून आहेत, व याच काँग्रेस ने आता पर्यंत भारताचा किती तरी अविभाज्य भाग चीनचा नरड्यात घातला आहे. नेहरूंच्या चीन प्रेमापाईच आपण संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेची स्थायी सीट गमावली आणि आपण चीनला ती ताटलीत सजवून देऊन टाकली. याच प्रेमापाई तिबेट च्या स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. मोदीजी खमके आहेत ह्या सर्वांना पुरून उरत आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डॉ. आंबेडकरांनी संविधान बनवल्यावर सांगितलं होतं, “आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य बाकी आहे.” आज 75 वर्षांनंतर परिस्थिती बिकट आहे. राजकीय स्वातंत्र्याचा नंगा नाच चाललाय, सामाजिक स्वातंत्र्याचे राजकारण चाललंय, आणि वैचारिक स्वातंत्र्याचं वाभाडं निघालंय.निधर्मी राजवट जाऊन धर्मनिरपेक्षता संविधानात आणली गेली ती आणीबाणीत ! हिंदूंनी आवाज उठवला की त्यांना “धर्मांध”, “कट्टर” म्हणायचं, पण अल्पसंख्यांकांसाठी विशेष हक्क मागितले गेले की त्याला “घटनात्मक मूल्य” म्हणायचं हाच खेळ चाललाय गेल्या 75 वर्षात. आरक्षणाचा हेतू होता सामाजिक अन्याय भरून काढणं. पण 1990 मध्ये मंडल आयोग आल्यानंतर आरक्षण ही मतांची दुकाने उघडण्याची आणि बहुसंख्यांचा श्वास गुदमरवण्याची यंत्रणा झाली. आता तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्ण साठी आरक्षण आलंय, पण ‘दुर्बल’ कोण, ते ठरवायला राजकीय पक्षांचं मंडळ बसतं. “सामाजिक न्याय” या नावाखाली समाजाचं विभाजन केलं गेलं, आणि राष्ट्राला बारीक गळफास घातला गेला.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी. पण येथे “भारत तेरे टुकडे होंगे” म्हणणाऱ्यांना पुरस्कार, आणि “भारत माता की जय” म्हणणाऱ्यांना बदनामी मिळते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बलात्कार आहे. कायदे राष्ट्र वाचवत नाहीत राष्ट्राची ओळख वाचवते. आणि आपल्याकडे तीच हरवत चालली आहे. त्यामुळे संविधनाचे पुंनर्मुल्यांकन आवश्यक आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल ?
🔽
#NationFirstAlways #IndiaSpeaks #pehalgamattack #indianarmy #congress #AbhijeetRane #operationSindoor





Comments