🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- May 7
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पेहेलगाम आतंकवादी हल्ला एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का ? चीन अमेरिका टेरिफ वॉर मुळे चीनचा गळा आवळला जातो आहे दुसरीकडे भाराची प्रगति आणि प्रतिमा उंचावत असल्याने चीन अस्वस्थ होता. वक्फ बोर्ड सुधारणा बील मुळे मुस्लिम चिडलेले आहेत... हीच ती वेळ तापलेल्या लोखंडावर हातोडा मारण्याची... हे चीनने बरोबर ओळखले. पाकिस्तान ने भारताला स्पेशली हिंदूंना भडकवण्यासाठी पेहलगाम मध्ये हिंदूंवर हल्ला केला. पाकिस्तानचे यामागे दोन हेतू आहेत असे दिसते.... एकतर पाकिस्तान मध्ये जी अंतर्गत बंडाळी माजली आहे त्यापासून तेथील जनतेचे लक्ष हटवणे आणि दुसरे व महत्वाचे चीनकडून पाकिस्तानला सुपारी मिळाली आहे. पेहलगाम हल्ल्याचे दोन उद्देश आहेत... भारताने चिडून पाकिस्तानावर हल्ला चढवला तर जोडीला चीन, बांग्लादेश सर्व बाजूनी हल्ले करून भारताला सीमेवर युद्धात गुंतवून ठेवून देशा सर्व समाजविघातक शक्तींना एकाच वेळी चार्ज करून पूर्ण घडी विस्कटून टाकणे. पेहलगाम हल्ला झाला तेंव्हा मुद्दाम धर्म विचारून मारले कारण काही करून, दंगली घडवून देशात अस्थिरता निर्माण करायची आहे. हे एकाच वेळी भारताला आतून आणि बाहेरून युद्धजन्य परिस्थितीत लोटण्याचे षडयंत्र आहे. परंतु मोदीजी याचा उत्तम इलाज करतील ही खात्री आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
घराणेशाहीचे दिवटे किती स्वार्थी आणि अप्पलपोटे असतात त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या नावाखाली विरोध केला अन् शेवटी तो महामार्ग जेव्हा पूर्णत्वास यायला लागला की आपल्या बापाचे नाव देऊन उद्धव ठाकरेंनी पोळी भाजून घेतली. नवी मुंबईतील विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या स्थानिकांच्या मागणीस डावलून तिथेही आपल्याच बापाचे नाव द्यायला हवे असं वातावरण निर्माण करण्यास यांनी सुरुवात केली होती.पण स्थानिकांनी तो नामकरणाचा लढा जिंकला त्यामुळे यांच्या बापाचे नाव तिथं देता आले नाही. आता पुरंदर विमानतळास विरोध करण्यास सुरुवात केलीय उद्या पूर्ण झाले की माझ्या बापाचं नाव द्या म्हणून मागणी करायला मागेपुढे बघणार नाहीत. आपल्या बापाचे नाव द्यायला हरकत नाही पण एखाद्या प्रकल्पाला आधी विरोध करायचा आणि तोच प्रकल्प पूर्णत्वास आला की आपल्या बापाचे नाव पुढं करायचे हा दुतोंडी मांडूळपणा येतो कुठून? उद्धव ठाकरे एक असं रसायन आहे जे अजून त्याच्या स्वतःच्या खोलीबाहेरही गेलेलं नाही. ज्या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा विरोध असतो तो प्रकल्प लवकर पूर्णत्वास येतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्वातंत्र्यवीर सावरकर आजन्म उपेक्षित राहिले आणि अजूनही त्यांची उपेक्षा संपत नाही. सरकारकडे डॉक्टर आंबेडकर यांचे लंडन मध्ये राहिलेले घर विकत घेऊन त्याचे स्मारक करायला पैसे आहेत , त्यांचे मुंबईत ,नागपुरमध्ये आणि दिल्लीत सुद्धा स्मारक करायला पैसे आहेत परंतु सावरकरांचे दादरमधील ऐतिहासिक निवासस्थान, 'सावरकर सदन', लवकरच पाडले जाऊन त्या इमारतीचा पुनर्विकासात बळी जाणार आहे. सावरकरांचे अनुयायी या ऐतिहासिक वास्तूच्या रक्षणासाठी न्यायालयात गेले असून त्यांनी या इमारतीला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. सावरकर सदनच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे, तिचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. ज्यांचे कार्य कायमच ब्रिटीशांशी असणारे संबंध , शिवाजी महाराजांवर आणि देवी देवतांवर टीका केल्याने वादग्रस्त राहिले आहे त्या ज्योतिबा फुल्यांची औट घटका टिकलेली शाळा बघितलेली वास्तु सुद्धा राज्य सरकार अहमहमिकेने विकत घेऊन त्याचे स्मारक करायचा घाट घालते पण हे भाग्य सावरकरांच्या नशिबी कधीच येत नाही. हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा हे घडत आहे हे खरच शोचनीय आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मोदी सरकारने हाती घेतलेली एक अप्रतिम आणि फार प्रसिद्ध नसलेली योजना म्हणजे हरित भिंत योजना आहे.ग्रीन वॉल ऑफ इंडिया हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश वाळवंटीकरण थांबवणे आणि अरवली पर्वतरांगेतील महत्त्वाच्या पर्यावरणाचे रक्षण करणे आहे. हा प्रकल्प गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या अरवली पर्वतरांगेभोवती पाच किलोमीटर रुंद हरित पट्टा तयार करणार आहे. जंगलतोड, खाणकाम, गुरेढोरे चारणे आणि मानवी अतिक्रमणामुळे अरवली कमकुवत होत आहे. यामुळे वाळवंटीकरण वाढत आहे, तलाव कोरडे पडत आहेत आणि वन्यजीवांसाठी अधिवास कमी होत आहे. थरचे वाळवंट आता पश्चिम राजस्थानपुरते मर्यादित नाही, त्याचे काही अंश हरियाणा, दिल्ली आणि मध्य भारतापर्यंतही पोहोचले आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी, सरकारने मार्च २०२३ मध्ये अरवली ग्रीन वॉल योजना सुरू केली. यात मोठ्या प्रमाणावर वनीकरण कृषी-वनीकरण आणि पाण्याच्या साठ्यांची निर्मिती यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे राजस्थानातील ८१% आणि एकूण सुमारे २.७० दशलक्ष हेक्टर वाळवंटी जमिनीची पुनर्स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प उत्तर भारताचे भवितव्य बदलणारा सिद्ध होणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अजित दादा गटाचे, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णासाहेब बनसोडे हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या पार्टीमध्ये ते आणि आकाश मोहोळ उर्फ आक्या बॉन्ड हा कुख्यात गुन्हेगार एकमेकांना केक भरवतानाचे दृश्य सध्या सोशल साईटवर फिरत आहे. या आक्या बॉन्ड वर 16 गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्याने अण्णासाहेब बनसोडे आणि त्यांच्या सुपुत्रासह व्यासपीठावर हाजरी लावली आणि अण्णाना त्याने पुष्पगुच्छ दिला , त्यांना केक भरवला आणि मिठी मारून फोटो सुद्धा काढून घेतला. काही दिवसांपूर्वी बनसोडे जींचा सत्कार अजित पवारांनी केला होता त्याच वेळी त्यांनी अण्णा आणि त्यांच्या सुपुत्राला आता तुमच्या वागण्या बोलण्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे आता आपण मोठ्या पदावर आहोत आता आपले वागणे व्यवस्थित असले पाहिजे अश्या कानपिचक्या दिल्या होत्या परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाची दोन्ही शकले ही नामचीन गुन्हेगार मंडळींचा अड्डा असल्याचे कायमच बोलले जाते परंतु विधानसभा उपाध्यक्षांना सुद्धा जर आपल्या पदाची मर्यादा सांभाळता येणार नसेल तर खरच कठीण आहे.
🔽





Comments