top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • May 2
  • 3 min read

Updated: May 4

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पिरंगूट गावातील एका बोर्ड मुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. या बोर्डवर पुढील मजकूर लिहिला होता आणि गावाच्या सरपंचांनी दावा केला आहे की या मुद्द्यावर स्थानिक मुसलमान सुद्धा सहमत आहेत. “पिरंगुट गावामध्ये बाहेरून येणार्‍या सर्व मुस्लीम बांधवांना कळवण्यात येते की, समस्त गावकरी मंडळी, पिरंगुट व स्थानिक मुस्लीम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये गावामधील मशि‍दीमध्ये स्थानिक मुस्लीम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लीम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लीम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने मशि‍दीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी याठिकाणी फक्त स्थानिक मुस्लीम बांधवच प्रार्थना करतील याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लीम बांधवांनी नोंद घ्यावी.” या धाडसी निर्णयाबद्दल स्थानिक मुस्लिम आणि गावकर्‍यांचे हार्दिक अभिनंदन कारण प्रत्येकच गावाने असा ठराव केला तर बेकायदेशीर घुसणार्‍या रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून देणे सोपे होईल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शरद पवार राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पहलगाम हल्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याचा चांगलाच दणका बसला आहे. वक्फ बोर्ड संदर्भात आणि पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर कोल्हे यांनी घेतलेली मुस्लिम धार्जिणी भूमिका जनतेला आवडलेली नाही. त्यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे नाशिक मध्ये शो आयोजित केले होते परंतु प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने सर्व शो रद्द करण्याची नामुष्की कोल्हे यांच्यावर आली आहे. दर्शकांनी त्यांना स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. यापुढे मुस्लिम तुष्टीकरण कराल तर तुम्हाला पाठीशी घालणार नाही. काही लोकांची अशी मागणी आहे 57 टक्के मुस्लिम मावळ्यांना घेऊन औरंगजेबची भूमिका साकारून शो मोहल्ल्यात दाखवण्यात यावे अशी मागणी देखील केली.पैसे कमवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना पुढे करायचं आणि जेंव्हा हिंदू सोबत राहण्याची वेळ येते तेंव्हा औरंग्याच्या अवलादीना पाठिंबा देता.. असे जास्त दिवस चालणार नाही असा संदेशच सामान्य लोकांनी या निमित्ताने समस्त पुरोगांयांना दिला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पहलगाम घटनेनंतर अनेक ठिकाणी पोलिसांची भुमिका पाक धार्जिणी भासली आहे. पाकिस्तानी झेंड्याचे स्टिकर रस्त्यावर लावले म्हणून काही ठिकाणी भारतीयांवर गुन्हे दाखल केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलिसांना पगार पाकिस्तानातून मिळतोय का?पाकिस्तानी झेंड्याचे स्टिकर रस्त्यावर लावले म्हणून पोलीस गुन्हा कसे नोंदवू शकतात? किंवा भारतीयांवर कारवाई करण्याचे कसे बोलू शकतात? बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानी लांडगे इकडे येणार.. इकडचे आधारकार्ड पॅनकार्ड मिळवणार, त्यावरून रेशन कार्ड मिळवणार, मतदार कार्ड मिळवणार.. त्यांची पोरं जन्माला घालणार, ही पोरं भारतीय मुसलमान, मराठी मुसलमान म्हणून ओळखली जाणार, अल्पसंख्य म्हणून भारत सरकारच्या सुविधा लाटणार, ह्यांना मतदानाचा हक्क मिळणार, ही बांगलादेशी, पाकिस्तानी कीड आमच्या देशात येऊन त्यांना अनुकूल असा नगरसेवक, त्यांचा आमदार, त्यांचा खासदार निवडणार आणि... यांच्या विरोधात हिंदू एकत्र आला..की आमचे पोलीस आम्हा ह्या पाकड्या आणि बांगलादेशीसाठी आम्हा हिंदूंनाच पोलिसी खाक्या दाखवणार...? गृहमंत्र्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्स यांच्यासाठी सुद्धा सेन्सॉर बोर्ड तयार करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी गेली 11 वर्षे हिंदुत्ववादी आवाज उठवत आहेत परंतु मोदी सरकार या विषयाला गांभीर्याने घ्यायला तयारच नाही. माहिती प्रसारण मंत्र्‍यांनी या गोष्टींचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उल्लू हे अ‍ॅप एक अ‍ॅडल्ट कंटेंट असणारे अ‍ॅप आहे. पण मग त्या परिस्थितीत हे केवळ वय तपासणी झाल्यावरच डाऊनलोड व्हायला हवे आणि त्यातील कंटेंट फक्त तिथेच दिसायला हवे. परंतु त्यांनी नोंदणी तशी केली आणि कंटेंट मात्र सर्वत्र पसरेल याची काळजी घेतली आहे. उल्लूच्या 'हाऊस अरेस्ट' या शो मध्ये एजाज खान एका महिला स्पर्धकाला विविध सेक्स पोजेस करून दाखव सांगतो. ती जेव्हा कबूल करते की तिला याबाबत माहिती नाही, तेव्हा तो विचारतो, "तू कधी प्रयोग केला नाही का?"तो दुसर्‍या स्पर्धकाला गहना वशिष्ठला, त्या दोन व्यक्तींना सेक्स पोजेस कशा असतात ते शिकवायला सांगतो. त्यानंतर त्या जोड्या प्रत्यक्षात त्या पोजेस दाखवतात. इतक्या भयानक अश्लील कार्यक्रमांवर कोणतेही नियंत्रण नसणे हे लज्जास्पद आहे. माहिती प्रसारण खात्याने आपल्या निष्क्रियतेचा त्याग करणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जातिगत जनगणना हा विषय सध्या चर्चेत आहे परंतु जनगणना ही संकल्पना ब्रिटीशांनी आपली फोडा आणि झोडा नीती अवलंबण्यासाठी लागणारी माहिती मिळवण्यासाठी भारतात आणली होती हेच आपल्या लोकांना माहिती नाही. जनगणना हा शब्द भारताला 1872 साली सर्वप्रथम माहिती झाला. ब्रिटीशांनी आपली राजवट स्थापन केल्यावर ब्रिटीशांनी प्रायोगिक स्वरूपाची जनगणना केली. तिचा उद्देश देशातील लोकसंख्येची संरचना, सामाजिक गट, वय, लिंग, व्यवसाय, धर्म, जात इत्यादी बाबींचा आढावा घेणे हा होता. कर वसुली, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकसंख्येची माहिती आवश्यक होती.पुरुष लोकसंख्या, वयगट, आरोग्य इत्यादींचा अंदाज घेणे.धर्म, जात, भाषा, व्यवसाय इत्यादी नोंदवून घेतले गेले. विभाजनाच्या अर्थात डिव्हाईड अँड रूल या राजकारणाला बळकटी देण्यासाठी विविध सामाजिक गटांची संख्या जाणून घेणे. हा शेवटचा उद्देशच सर्वात महत्वाचा होता. मुस्लिमांची लोकसंख्या जाणून घेऊन त्यांच्या अस्मितेला खतपाणी घालणे यासाठी या जनगणनेचा वापर केला ज्याचा अंतिम परिणाम फाळणी हा होता. जातिगत जनगणना सुद्धा हिंदूंच्या विभाजनचे षडयंत्र आहे आणि हिंदूंनी ते हाणून पाडणे आवश्यक आहे.

🔽

#हिंदूविरोधीराजकारण #घुसखोरबाहेर #जातिगतजनगणना #BangladeshiOut #RohingyaQuitIndia #SecurityFirst #StopOTTVulgarity #AbhijeetRane #BJP #NarendraModi #ShradPawar #amolkolhe







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page