🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 30
- 4 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“निखारे फुलले आहेत. ते आता विझू देऊ नका.” पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्याची हीच वेळ आहे. प्रतिशोधाच्या भावनेने सगळा देश पेटला आहे. आता हे निखारे विझू देऊ नका. पहेलगामच्या घटनेने सगळा देश एकवटला आहे. जात, पात, धर्मावरचे मतभेद कुठल्याकुठे उडून गेलेत. आता उशीर झाला तर ते पुन्हा डोकं वर काढतील. त्यांना आता संधीच मिळायला नको. सगळं जग आपल्या बाजुने आहे. पण चीन , तुर्कस्तानला कधी दुर्बुध्दी सुचेल ते सांगता येत नाही. पापी पाकिस्तानला मदत करण्यासाठी ते एकवटण्याआधीच आपण तडाखा मारला पाहिजे. विरोधी पक्ष तर सारासार विचारही विसरले असून आता ते चक्क पाकिस्तानचे एजंट बनून देशात वातावरण तयार करत आहेत. अन्यायाचा प्रतिकार वेळेतच करायला हवा. अत्याचाराचा बदला जखम ओली असेपर्यंतच घ्यायला हवा. उशीर झाला तर धग कमी होते. एक शांत, सहिष्णु, सुसंस्कृत आणि समृध्द देश होरपळून टाकण्यासाठी शत्रू टपून बसलाय. तो लपून छपून केंव्हाही घाव घालील, प्रसंगी माफीचं नाटकही करील. म्हणून अखंड सावध रहा. शत्रूने आपल्यावर घाव घालण्याआधीच आपला घाव त्याच्यावर पडला पाहिजे. म्हणून प्रत्येक भारतीयच्या मनात पेटलेला सूडाग्नी शांत होण्यापूर्वीच घाव घाला मोदीजी आणि ही घाण संपवून टाका.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भूखंडाचे श्रीखंड ओरपणारे , महाघोटाळेबाज नेते ही शरद पवारांची ओळख सर्वज्ञात आहे. सध्या सर्वत्र सत्ताहीन असल्याने आपला घोटाळे करण्याचा आवडता उद्योग करण्याची त्यांना संधि मिळत नाही. त्यामुळे मुसलमान आणि पाकिस्तान तुष्टीकरण करत चर्चेत रहाण्याच्या ऊचापती त्यांना करण्याची वेळ आली आहे. त्यांचा एक प्रदीर्घ सुरू असलेला घोटाळा उघड झाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नावाची एक इमारत मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. जमीन फुकटात मिळवली आणि आपण तहहयात अध्यक्ष राहू याची तरतूद केली. नंतर मुलीला गादी मिळेल याची पण काळजी घेतली. ही इमारत यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि स्मृती यांचे जतन करत त्यांच्या कार्याला वृद्धिंगत करण्यासाठी वापरली जाणार होती. परंतु सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवत या इमारतीत व्यापारी कार्यालये उभारली आहेत. सभागृह उभारले आहे आणि या सगळ्यांचे मजबूत भाडे मिळवले जात आहे. या भाड्यावर अर्थातच बाप आणि लेक डल्ला मारतात. पण या भाड्याच्या रकमेचा एक हिस्सा जो सरकारळा मिळायला हवा आहे आणि जो वर्षानुवर्षे दिलाच गेला नाही त्याचे मूल्य फक्त 8.50 कोटी रुपये आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, राजकारणापलीकडील मैत्री त्यागून हे भाडे वसूल करा आणि देत नसतील तर संपूर्ण इमारत सरकारच्या ताब्यात घेऊन टाका.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आपल्याला राखता आली नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढताना वापरलेल्या वाघनख्या आपण परत मिळवल्या आहेत आणि या मिळवण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे आहे. देवेन्द्रजींनी परत एकदा असाच पराक्रम गाजवला असून नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. आपला ऐतिहासिक वारसा जपण्याच्या या सातत्यपूर्ण कार्यासाठी देवेन्द्रजींचे मनापासून अभिनंदन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताची फाळणी घडवणारा दुरात्मा , बलुचिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसणारा राक्षस मोहम्मद अली जिन्ना कुत्र्याच्या मौतीने मेला होता. 11 सप्टेंबर 1948 रोजी, क्षयरोग आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने गंभीर आजारी असलेल्या जिन्नाला कराचीला आणण्यात आले. एक खटारा रुग्णवाहिकेत बसून दवाखान्याच्या वाटेवर ती बंद पडली आणि जिन्ना, कराचीत धडपडत, रस्त्यावर वाहतूक आणि गोंधळात अडकून पडला. जिन्नाची बहिण आणि एक नर्स जिन्नाच्या मरणासन्न शरीरावर माशा आणि मच्छर बसू नये म्हणून हातपंखे फिरवत होत्या. जवळपास एक तास कोणतीही मदत आली नाही. तो असहाय्य अवस्थेत पडून राहिला, ज्या देशासाठी त्याने इतक्या निष्पाप लोकांचे रक्त सांडले आणि घसा कोरडा केला, त्याच देशातील लोकांकडून त्याला दुर्लक्षित करण्यात आले. रात्री त्याचा तडफडून मृत्यू झाला. त्याच्या शेवटच्या क्षणांना "राष्ट्रीय अपमान" म्हणून तिथले ईतिहासकार वर्णन करतात. तसेच हे एक कटू सत्य आहे की पाकिस्तानचा निर्माता त्याच अराजकतेने ग्रासला गेला ज्याला त्याने जन्म दिला होता. कायदे आजम म्हणवला जाणारा जिन्ना. त्याने कलमा पढून एक राष्ट्र जन्माला घातले, त्या राष्ट्राचा प्रमुख वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने कुत्र्यासारखा तडफडून मेला. आज 75 वर्षे झाली आहेत पाकिस्तान अजूनही तसाच भणंग भिकारी आहे आणि तिथले लोक उपचारांसाठी शत्रू राष्ट्र भारतात येत आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एकनाथ शिंदे पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने काश्मीर मध्ये गेले. जाताना आपली टिम बरोबर घेऊन गेले आणि तिथे अडकून पडलेल्या मराठी बांधवांच्या सुटकेसाठी त्यांनी तिथे राहून अत्यंत योग्य नियोजन केले. तातडीने विमानांचे आयोजन करणे , अडकलेल्या प्रवाशांना धीर देणे , त्यांच्या रहाण्याखाण्याची व्यवस्था करणे आणि त्यांना व्यवस्थित महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग प्रशस्त करणे हे काम शिंदे यांच्या टिम ने अत्यंत उत्तम पद्धतीने केले आहे. महाराष्ट्रात परत आलेला प्रत्येक पर्यटक त्यांचे कौतुक करतो आहे. परंतु आदिल नावाचा जो घोडेवाला मारला गेला होता त्याच्या घरी जाऊन त्यांनी 5 लाख रुपये मदत दिली आणि त्याच्या कुटुंबीयांना घर बांधून देतो असे आश्वासन दिले ही त्यांच्याकडून चूक झाली आहे. कारण हा आदिल दहशतवाद्यांचा खबरी आणि सहाय्यक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्वसमावेशक वागणे त्यांच्या अंगलट आले आहे. भारतातील समस्त मुस्लिमांची प्रवृत्ती आपल्या राजकीय नेत्यांनी समजून घेणे आवश्यक आहे अन्यथा असे तोंडघशी पडण्याची वेळ वारंवार येऊ शकते.
🔽





Comments