top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 28
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अतिरेकी हल्ल्यानंतर सोशल मीडिया विश्व हे भक्त आणि पुरोगामी या दोन ग्रुप्समध्ये विभागले गेले आहे. त्याबद्दल काही विलक्षण निरीक्षण. दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून गोळ्या चालवल्याने हल्ल्यावर व्यक्त होताना पुरोगाम्यांना ‘दहशतवादाला धर्म नसतो’ ऐवजी “हो, दहशतवादाला धर्म असतो. पण…..” असे बोलण्याची वेळ आली. धर्माचा अतिरेक वाईट, हे तथ्य सांगताना पुरोगामी इस्लामी कट्टरवाद आणि हिंदुत्ववाद्यांची काही अतिरेकी कृत्ये यांना एकाच पातळीवर घेऊन येतात. पण इस्लामी कट्टरवादी हे क्रिकेटमधली ऑस्ट्रेलिया असले तर हिंदू अतिरेक्यांना अजून फारतर झिम्बाब्वेची पातळी गाठता आलीये. क्रिकेट फॉलो करणारा माणूस सगळं लक्ष झिम्बाब्वेवर केंद्रित करतोय आणि ऑस्ट्रेलियाकडे कानाडोळा करतोय, असं होत नाही. देशातल्या धर्मावरून असणाऱ्या सगळ्याच भांडणांना संघ, भाजप वगैरेच जवाबदार आहेत, असं पुरोगाम्यांना अगदी प्रामाणिकपणे वाटतं. समजा देशात द्वेष पेरणारं हिंदुत्ववादी राजकारण नसतं, तर इस्लामी दहशतवादही नसता, अशी अनेक पुरोगाम्यांची भाबडी समजूत असते. हिंदूंनी मनुवादी बनू नये, असं पुरोगाम्यांना वाटतं. त्यासाठी ते खूप प्रयत्नही करतात. पण मुस्लिमांनी इस्लामपासून थोडं लांब जावं, हा प्रयत्न पुरोगामी करताना दिसत नाही. उलट दहशतवादी हे खऱ्या इस्लामपासून भरकटलेले जीव आहेत, अशी अनेक पुरोगाम्यांची भाबडी समजूत असते. इस्लाम न समजलेल्या पुरोगामी मंडळींचा द्राविडी प्राणायाम हास्यास्पद होतोय.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अतुल कुलकर्णी नावाचा एक पुरोगामी अभिनेता पहलगामला गेला. 22 तारखेला हल्ल्यानंतर अनेक जणांचा राष्ट्रवाद अचानक जागा झाला. अनेक जण, ज्यात सेलिब्रिटी, सामाजिक विचारवंत, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष समाजातील लोक इत्यादीना काश्मीरी मुसलमानांचा दुतोंडीपणा उघड केल्याने वाईट वाटले.पण 14 सप्टेंबर 1989 ला टीका लाल टपलु ची हत्या झाली तेव्हा या दहशतवादाला चॅलेंज देत कुणीही तिथे का गेला नाही?सलग 3 वर्षे काश्मिरी हिंदूंचे हत्यासत्र सुरू असताना, एकलाही जाग का आली नाही?लाल चौकात तिरंगा फडकावण्यावर धमकी आल्यानंतर भाजप चे नेते सोडून उर्वरित एकाही व्यक्तीने धमकीला उत्तर म्हणून लाल चौक गाठला नाही. का? आज आपण सुरक्षित राहू एवढी शाश्वती असल्यानेच जाता आले हे सांगणे जमले नाही तरी कुलकर्णी नक्कीच जाणतात. बाकी या लोकांनी काश्मिर जायचे ठरवले आणि गेले. मात्र ते जिथे जात आहेत ते नेहमीचे टुरिस्ट स्पॉट्स आहेत जिथे आसपास पुरेपूर सुरक्षा उपलब्ध आहे. घटना घडली तो स्पॉट अगदीच नवा आणि सरकारी बिना अनुमती सुरू केला होता. साहजिकच आहे, सुरक्षित नव्हते आणि या षडयंत्रात स्थानिक काश्मिरी मुसलमानच समाविष्ट होते हे आता सिद्ध होत असल्याने हे महाराज कव्हर फायर द्यायला दाखल झाले आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारत सिंधु नदीचे पाणी अडवायचे असेल तर अजून 30 वर्ष अडवू शकत नाही अश्या पद्धतीच्या खोट्या आणि नकारात्मक बातम्या देणार्‍या समस्त भारत, मोदी आणि भाजपा द्वेष्ट्या न्यूज च्यानेल्स साठी हा महितीचा खजिना आहे. उरीच्या हल्ल्यानंतरच मोदींनी घोषणा केली होती पानी और खून एक साथ नही बहेगा. त्यावर त्याच वेळी काम सुरू झाले. किशनगंगा हायड्रल पॉवर (झेलमची उपनदी) २०१८ मध्येच २३ किमी बोगद्याद्वारे पाणी वळवण्यासाठी तयार आहे.रतले हायड्रोजन पॉवर (चिनाबवरील) २०२१ मध्येच पुनरुज्जीवित करण्यात आले. तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्प (झेलमवरील) २०१६ मध्येच पुनरुज्जीवित करण्यात आला आणि पाकिस्तानात जाण्यापासून अतिरिक्त पाणी रोखण्यासाठी शाहपूरकंदी धरणाचे (रावीवरील) काम २०१८ पासून सुरू आहे. पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी उझ बहुउद्देशीय प्रकल्प (रावीची उपनदी) २०२० पासून सुरू आहे. आयडब्ल्यूटी ही ५० च्या दशकात नेहरूंची चूक होती जेव्हा त्यांनी पाकिस्तानशी करार केला आणि ८०% पाणी दिले. मोदीजींना माहीत आहे की ही चूक दुरुस्त करण्याची गरज आहे आणि म्हणूनच त्या वेळेसपासून पाकिस्तानला गळा दाबण्यासाठी ग्राउंडवर्क सुरू होते आता ते पूर्णत्वाला आले आहे. ही पोकळ घोषणा नाही आता हे वास्तवात घडणार आहे आणि देशभरातील पाकिस्तान प्रेमी राजकीय नेत्यांचे आणि पत्रकारांचे थोबाड काळे होणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारताने पाकिस्तानचे पाणी तोडून एक चुकीचा पायंडा पाडला आहे आणि भविष्यात भारत चीन संबंध तणावपूर्ण झाले तर चीन सुद्धा असे करून आपल्यावर सूड उगवेल असे दिवास्वप्न बघणार्‍या लोकांसाठी ही माहिती आहे. भारत आणि चीनमध्ये पाकिस्तानप्रमाणे कोणताही जलकरार केला गेलेला नाही. केवळ पाऊसपाण्याच्या परिस्थितीविषयीची आगाऊ माहिती चीनने भारताला देण्याविषयीचा २०१३ सालचा एक सामंजस्य करार तेवढा अस्तित्वात आहे. भारतात वाहणारी एकही नदी चीनमधून येत नाही. ज्या तीन नद्या येतात, त्या चीनव्याप्त तिबेटमधून येतात. या तीन नद्या म्हणजे सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रा या होत. सिंधू नदी तिबेटमधील कैलास पर्वतावर उगम पावून लगेचच भारतात प्रवेश करते. ती भारतात मोठे स्वरूप प्राप्त करत असली, तरी तिबेटमधील तिचं पात्र खूपच लहान आहे. पाणी अडवायला तिथे वावच नाही. सतलज नदी तिबेटच्या 'राक्षसताल' सरोवरानजिक उगम पावते या नदीच्या भारतातून वाहणाऱ्या पाण्यापैकी २०% पाणी तिबेट मधून येतं परंतु, हे पाणी पूर्णपणे बंद केलं तर अवघा तिबेट जलमय होईल. ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सध्या एक प्रचंड धरण बांधायला घेतलं आहे. पण त्या धरणात विनाकारण पाणी अडवले तर अवघा तिबेट आणि चीनचा काही भाग जलमय होईल. शिवाय धरण फुटेल ती गोष्ट वेगळीच. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारताचे प्रथम पंतप्रधान नेहरूंचे अधिकृत निवासस्थान तीन मूर्ती भवनाचे त्यांच्या मृत्युनंतर रूपांतर जवाहरलाल नेहरू संग्रहालय तीन मूर्ती भवन असे नामकरण केले गेले आणि तिथे फक्त नेहरू यांच्या वस्तु , त्यांना भेट मिळालेल्या गोष्टी यांचा संग्रह केला गेला. हे करण्याचे कारण नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांची तिथे रहाण्याची लायकी नाही असे इंदिरा गांधीचे मत होते. भविष्यात कोणीही गांधी नेहरू परिवार सोडून अन्य परिवाराची व्यक्ती पंतप्रधान झाली तर हीच समस्या येईल म्हणून या वास्तुचे संग्रहालयात रूपांतर केले गेले. या संग्रहालयात नेहरूंची गादी, उशी, रजाई, चष्मा, घड्याळ आणि एडविना यांच्यासह असणारे फोटो असे मूल्यवान सामान ठेवले गेले. मोदींनी तीन मूर्ती भवनातीळ 18 खोल्या उघडल्या, त्या प्रत्येक खोलीत भारताच्या सर्व पंतप्रधानांच्या स्मृतीचिन्ह ठेवल्या आणि सुधारित संग्रहालय 271 कोटी रुपये खर्चून 10,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर बनवले. या प्रकल्पाला 2018 मध्ये मान्यता देण्यात आली होती. या संग्रहालयात माजी पंतप्रधानांशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, भाषणे, व्हिडिओ क्लिप, वृत्तपत्र क्लिपिंग्ज, मुलाखती आणि त्यांचे मूळ लेखन प्रदर्शित केले जाईल..!! आता नाव आहे पंतप्रधान संग्रहालय. नेहरूचे नाव पुसले गेले. घराणेशाहीचे प्रतीक असणारी अजून एक उर्मट वास्तु लोकशाहीने गिळंकृत केली.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page