🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 27
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संवेदनशीलता काय असते, हे एकूणच ठाकरे नावाच्या वलयाची गुलामगिरी करणारांना सांगून उपयोग नाही. परंतु सामान्य जनतेने हे समजून घेणे आवश्यक आहे. परवा सर्व पक्षीय बैठक झाली. त्यात काय ठरले काय बोलणे झाले ते सर्व जाहीरही झाले. मात्र महाराष्ट्रातून ज्या पक्षाचे नऊ खासदार आहेत वीस आमदार आहेत, दोन राज्यसभा खासदार तर सात विधानपरिषद आमदार आहे त्या ऊबाठा सेने चा एकही प्रतिनिधी नव्हता. ऊबाठा परदेशात फिरायला गेलाय सहकुटूंब हे सर्वांनाच माहीती आहे. अशी काही घटना घडल्यानंतर तो लगेचच परत येईल ही अपेक्षा वेडेपणाची ठरेल. मात्र त्याच्या पक्षाचे दोन खासदार जे कायम पत्रकारांच्या बूमवर बसून असतात ते अचानक सकाळी पत्रकार परिषद घेऊन बूम बाहेर काढून देशाच्या दुर्गम भागात दौऱ्यावर जातात जेथून त्यांना दिल्लीला पोहोचणे शक्य होत नाही हे ढळढळीत खोटे ॲान रेकॅार्ड लिहीण्याची हिम्मत यांचा एक खासदार करतो हे निश्चितच संतापजनक आहे. टिवल्याबावल्या करतच पक्ष चालवायचा आहे यांना तर जनता यापुढे अजून खाली खेचणार हे निश्चित. यांच्या सोबत आता जेवढे मुर्ख उरलेत ते देखील अशा एकेक घटनेतून बोध घेतील आणि शहाणे होतील अशी एक भाबडी आशा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इराणच्या युद्ध सज्जतेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. आता इराणला आपला क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा लागू शकतो. इराण मधील शहीद राजाई बंदर अब्बास इथे एका कंटेनर मध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यात 14 जण मेले असून 700 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते कारण या स्फोटामुळे बंदरावरील एक इमारत पूर्ण कोसळली असून तिच्या ढिगार्याखाली अनेक कर्मचारी अडकले असल्याचा संशय आहे. हा स्फोट इतका भीषण होता की तब्बल 50 किलोमीटर अंतरापर्यन्त या स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. चीनने आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवण्यासाठी इराणला अत्यंत स्फोटक असे द्रव्यस्वरूप इंधन या कंटेनर मध्ये पाठवले होते आणि नेमका हाच कंटेनर मोसादने उडवला आहे ज्यामुळे इराणला आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवता येणार नाही. त्यामुळे ही बातमी इराणी मिडिया आणि सरकारकडून दाबून ठेवली जाते आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पहलगाम हल्ल्यानंतर आपला मिडिया , आपला समाज खडबडून जागा झाला आहे. देशभरात असणारे बेकायदेशीर पाकिस्तानी , बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याबद्दल लोक प्रश्न विचारू लागले आहेत. महाराष्ट्रातील मिडिया सुद्धा जागे झाल्याचे नाटक करतो आहे. परंतु 2014 पासूनच्या आपल्या मीडियातील समस्त बातम्या बघा... संपूर्ण दिवसभर फडणवीस यांना दणका. सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा संजय राऊत काय म्हणाला ? यावर दळण घालत बसणे , शरद पवार , जितेंद्र आव्हाड , सुप्रिया सुळे ,अमोल मिटकरी, छ्गन भूजबळ, ब्रिगेडी मंडळी यांनी हिंदू धर्म , देवी देवता यांच्याबद्दल अपमानास्पद काय बोलले, जातीयवाद भडकावणारे कोणते विधान केले यावर संपूर्ण दिवसभर रिकामी चर्चा सुरू असायची. संतोष देशमुख खून असेल किंवा एखादी दंगल त्यावर सुद्धा फक्त जातीयवादी दृष्टीनेच चर्चा करायची. उरला सुरला वेळ उबाठा आणि राज ठाकरे मराठी अस्मितेचे ठेकेदार आणि त्यांचे चेलेचपाटे यांच्या फालतू बडबडीला प्राधान्य द्यायचे. देश , समाज आणि राज्य यांच्या समोरील भेडसावणार्या एकाही मुद्द्याला आपले न्यूज च्यानेल कव्हर करत नव्हते. आता त्यांना जरा जाग आली असून थोडेफार तरी सुसंगत मुद्दे मांडले जात आहेत हे ही नसे थोडके.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताने सिंधु नदी करार कचर्याच्या पेटीत टाकला. त्यामुळे भारताला पाकिस्तानला कोणतीही माहिती देणे बंधनकारक उरलेले नाही. त्यामुळे वितस्ता उर्फ झेलम नदी ही भारताच्या काश्मीर मधून पाकिस्तानातील काश्मीर मध्ये वहात जाते. उन्हाळ्यात बर्फ वितळून या सर्वच हिमालयात उगम पावणार्या सर्व नद्यांना पुर येत असतो. भारतातील भागात वाहाणार्या झेलम नदीवर भारताने काही बंधारे बांधले आहेत. परंतु यावेळी झेलम नदीचे पाणी वाढू लागले आणि भारतीय आपल्या बंधार्यांना दरवाजे टाकून बंद करायला विसरून गेले. परिणाम पाकव्याप्त काश्मीर मधील मुझ्झफराबाद इथे पुर आला. नदीच्या किनारी रहाणार्या सगळ्या नागरिकांना हलवण्याची वेळ आली. सिंधु जल करार रद्द केल्याने पाणी अडवलेच पाहिजे असे कुठे संगितले आहे ?? तुम्ही पाणी अडवणे विसरू पण शकता आणि तुम्हाला विसर पडलाय हे पाकिस्तानला सांगायला सुद्धा विसरू शकता, तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारू शकत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पहलगाम हल्ल्यानंतर समस्त राजकीय नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या बघितल्या तर अकबरुद्दीन ओवेसी हे भारताच्या राजकारणातील सर्वात परिपक्व राजकीय नेते आहेत हे सिद्ध झाले आहे. त्यांनी केवळ संतुलित प्रतिक्रिया दिली म्हणून ते परिपक्व आहेत असे नाही तर आपण ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, आपण ज्या समाजाचे नेते म्हणून मिरवतो त्या समाजाच्या हिताची सातत्याने काळजी करणे हा आपला धर्म आहे हे त्यांनी त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. ते मुस्लिमांचे नेते आहेत आणि परिपक्व प्रतिक्रिया देऊन त्यांनी भारतीय मुस्लिमांवर हिंदूंचा रोष ओढवला जाणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. याउलट समस्त विरोधकांच्या प्रतिक्रिया बघा. महाराष्ट्राचा विचार केला तर राजकरणात 50 वर्षे काढून सुद्धा पवारांच्या मेंदूचा इतका विकास झाला नसल्याचे उघड झाले आहे आणि पवारांनाच परिपक्व वागण्याचे महत्व उमगत नसेल तर त्यांना आदर्श समजणार्या उधोजींच्या माकडांना ही अक्कल कुठून येणार ? पवार , सुप्रिया , जितेंद्र आव्हाड आणि उधोजींचे समस्त शिलेदार सगळे जण मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात व्यस्त आहेत आणि ओवेसी भयभीत मुस्लिम समाजाला आश्वस्त करतो आहे. हा खूप मोठा फडक आहे.
🔽
#AbhijeetRane #PahalgamTerrorAttack #uddhavthakrey #Shivsena #NarendraModi #BJP #sharadpawar #SupriyaSule #jitendraawhad #pakistan




Comments