🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 27
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र सरकारची अवस्था आंधळे दळते आहे आणि कुत्रे पीठ खाते आहे अशी झाली आहे. हजारो कोटी रुपये अक्षरशः निरर्थक अश्या प्रकल्पावर खर्च होतात आणि त्याचे कुणालाही काहीही सोयरसूतक नसते. द ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राइक झाला 1982 साली आणि त्यानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या आहेत. आता या गोष्टीला 37 वर्ष लोटली. गिरणी कामगारांना हक्काचा मोबदला मिळाला नाही. कित्येकांना पीएफ आणि ग्रॅच्युटी सुद्धा मिळाली नाही. गिरणीमालकांना या जागा ब्रिटीशांनी कवडीमोल भावाने दिल्या होत्या आता त्यांना या जागांवर मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या करून पैसे कमवायचे आहेत. हे उद्योग सुरू होऊन सुद्धा 15-20 वर्षे लोटली आहेत. आणि अजूनही महाराष्ट्र सरकार गिरणी कामगारांसाठी मोफत घरांचे प्रकल्प राबवण्याचे स्वप्न बघत आहे. पंधरा हजार कामगारांना यांनी घरे वाटप केली असून अजून एक लाख कामगारांना घरे देण्याचे यांचे उद्दीष्ट आहे. पण हे खरोखरचे गिरणी कामगार आहेत का सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोय केली जाते आहे हे सुद्धा कळणे अशक्य आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी फुकटचे घर मिळणे हे म्हणजे थेट स्वर्गात स्थान मिळण्यासारखे आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारत या देशातील कायदे इतके बुळचट का आहेत ? भारतीय जनता पक्ष आणि सरकार हे इतके नेभळट का आहेत ? महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना स्वाभिमान आणि स्वधर्माभिमान का नाही ? हे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू शोकसंतप्त होऊन विचारत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर सोशल साईटवर फेक बातम्यांचा सुळसुळाट झाला आहे. मेलेल्या लोकांमध्ये 15 लोक मुसलमान आहेत ही शंभर टक्के खोटी बातमी नावासकट छापली गेली. परंतु छापणार्या व्यक्तीवर काहीही कारवाई नाही. धर्म विचारून मारले नाही हे शरद पवारांच्या पासून झाडून सगळे पुरोगामी बरळत आहेत परंतु त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे खोट्या बातम्या छापत आहेत, न्यूज च्यानेल धादांत खोटे बोलत आहेत. राजकारणी 13 वा बोंबस्फोट सांगितला तोच प्रयोग करत आहेत. पवारांनी पोसलेले पुरोगामी विचारवंत आणि सोशल साईट वरील इन्फ्लुएंसर मंडळी खोट्या बातम्या देऊन व्हायरल करत आहेत. आणि महाराष्ट्र शासन काय कारवाई करत आहे ? शून्य. उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे फडणवीस असल्या खोट्या बातम्या देणार्या टोळीची नेता असणार्या पूजा पाटील च्या लग्नाला उपस्थित रहात आहेत आणि तिच्या नवर्याला माझा छोटा भाऊ म्हणत आहेत. खरोखर लज्जास्पद घटनाक्रम आहे हा... !
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
'पहलगाम हिंदू हत्याकांड' हे ओमर अब्दुल्ला सरकारच्या आशीर्वादाने झाले आहे का ?'इंटेल फेल्युअर' बाबत सरकारने विरोधकांना माहिती दिली. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात ही घटना घडली. जून मधील अमरनाथ यात्रेपर्यंत पर्यटकांसाठी हा भाग एक 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित करण्यात आला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना कोणतीही माहिती न देता हल्लीच हे प्रतिबंधित क्षेत्र खुले केले व लोकल हॉटेलवाले, टॅक्सी चालक-मालक, घोडे-खच्चर चालक-मालक, फेरीवाले, रिसॉर्टवाले यांनी पर्यटकांना तिथे नेले. जम्मू-काश्मीर पोलीसांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती!गेल्या दोन दिवसांत 1500+ लोकांची धरपकड, यामागे हेच कारण आहे. या केसमध्ये सर्वच स्थानिक 'सस्पेक्ट' आहेत. सरकारने 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित केलेले असूनही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि त्याची माहिती सुरक्षा दलांपासून लपवली. स्थानिक अधिकारी म्हणजे ओमर अब्दुल्ला यांच्या हाताखालील कर्मचारी.'पहलगाम हिंदू हत्याकांड' हे ओमर अब्दुल्लाह सरकारचेच पाप आहे आणि हे लवकरच उघड होणार आहे. याचे सुतोवाच बैठकीत झाल्याने समस्त विरोधकांनी सरकारला तुम्ही जे कराल त्यात आम्ही बरोबर आहोत अशी ग्वाही देऊन बैठक संपवली.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात
तुलसी गेब्बार्ड या भारतीय वंशाच्या अमेरिकन उच्च पदस्थ आहेत. अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स आहेत. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर टीम मधील टॉप-3 पोजिशन वर त्या कार्यरत आहेत. त्यांनी पहलगाम घटनेनंतर केलेले ट्विट बघा, ”पहलगाममध्ये 26 हिंदूंना लक्ष्य करून ठार मारण्यात आलेल्या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत भक्कमपणे उभे आहोत. ज्यांनी या हल्ल्यात आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत, पंतप्रधान मोदी आणि भारतातील सर्व लोकांसोबत माझ्या प्रार्थना आणि संवेदना आहे. या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे!” जी गोष्ट अमेरिकन उच्च पदस्थ असलेल्या पूर्वाश्रमीच्या भारतीय व्यक्तीला समजते ती गोष्ट 50 वर्षांपेक्षाही अधिक मोठी राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवार यांना समजत नसेल तर त्यांचे जगणे व्यर्थ आहे. खोटारडा 13 वा बोंबस्फोट सांगून त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करून झालेच आहे. आता इतक्या उतार वयात सुद्धा मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी धादांत खोटे बोलण्याची ही घाण सवय बघून या माणसाचे वय बघून सुद्धा त्याचा आदर करावा असे वाटत नाही. शरद पवार ही देशाच्या राजकारणाला लागलेली कीड आहे हेच खरे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रातील राजकीय नेते सद्गुणविकृती आणि सर्वधर्मसमभाव या दोन्ही विषारी विचारसरणींमध्ये इतके बुडालेले आहेत की त्यांना सत्य कधीच दिसत , समजत आणि उमगत नाही. एकनाथ शिंदे काश्मीरला गेले, तिथून आपल्या मराठी लोकांना परत आणण्याच्या मोहिमेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला हे सगळे ठीक आहे. परंतु नको तिथे उत्साही वागणे अंगलट येऊ शकते हे त्यांच्या आणि त्यांच्या सल्लागारांच्या का लक्षात आले नसेल ? घटना घडल्यावर तब्बल 1500 + स्थानिक नागरिक पकडले गेले. त्यांची कसून चौकशी सुरू झाली. या घटनेत घोडेवाले आणि अन्य सामान्य व्यावसायिक मंडळींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे समोर येत असताना एक मुसलमान घोडेवाला या हल्ल्यात दगावला. जो संशयित आहे. त्याच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे जाऊन भेटून आले. सय्यद आदिल हुसैन शाह असे या मेलेल्या युवकाचे नाव आहे आणि त्याच्यावर तपास यंत्रणांचा मुख्य संशय आहे, त्याच्या कुटुंबीयांना शिंदे पाच लाख रुपये वाटून आले आहेत. मुसलमानांना मदत देण्याची महाराष्ट्रातील हिंदू नेत्यांना इतकी घाई का असते ??? पक्ष कोणताही असो पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या या मुस्लिम प्रेमाची सामान्य नागरिकांना आता किळस येऊ लागली आहे
🔽
Comments