top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 25
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पुंनर्जन्म आहेत. एकनाथ महाराजांनी आपल्यावर 108 वेळा थुंकलेल्या यवनाला क्षमा केली होती त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्या विरोधकांना क्षमा करत सुटले आहेत. मराठा आरक्षण आंदोलन भरात असताना पूजा पाटील नावाच्या एका तरुणीने देवेंद्र फडणवीस यांना, “तुझी बायको मागत नाही, आरक्षण मागते आहे. “ इतक्या उर्मट भाषेत उल्लेखले होते. पुढे ही मुलगी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. आता ती एक महिना काश्मीर मध्ये आहे. का आहे ? हे आता पहलगाम हल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढावे असे रहस्य आहे. ती तिथून महाराष्ट्रात आल्यावर थेट शरद पवारांना भेटू शकते अश्या सर्वार्थाने पुरोगामी कनेक्शन असलेल्या, कट्टर भाजपा द्वेष्टी , देवेंद्र फडणवीस द्वेष्टी असलेल्या मुलीच्या लग्नाला देवेंद्र फडणवीस जातीने हजर होते आणि त्यांनी तिला तोंड भरून आशीर्वाद दिला. आपल्यावर पातळीहीन टीका करणार्‍या अर्थात शा‍ब्दिक थुंकणार्‍या व्यक्तिला क्षमा करण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ संत एकनाथ यांच्याकडेच होते त्यामुळे आता देवेन्द्रजींना सुद्धा आपण शांती ब्रह्म म्हणायला काहीच हरकत नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि स्वतः उद्धव ठाकरे यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि संपूर्ण देश क्षुब्ध झाला आहे. देशभरातली सामान्य नागरिक अत्यंत चिडले आहेत. पाकिस्तानवर हल्ला करून आता त्यांना अद्दल घडवणे आवश्यक आहे ही सामान्य जनतेची मागणी होती. केंद्र सरकारने या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे निमंत्रण गृहमंत्र्यांनी किंवा त्यांच्या सचिवांनी फोन करून दिले होते. ओवेसी सारखे लोक सुद्धा या बैठकीला गेले. सातत्याने सरकारवर टीका करणारे कोंग्रेसी नेते या बैठकीला गेले. परंतु उद्धव ठाकरे किंवा त्यांचा प्रतिनिधी या बैठकीला गेला नाही. दुर्दैव असे की त्यांना याचे भूषण वाटत आहे. एखाद्या व्यक्तीने बालिश असावे , मूर्ख असावे पण याला कुठेतरी एक मर्यादा असते. उद्धव ठाकरे यांचे वर्तन सर्व मर्यादांचा नाश करणारे आहे. आपण या बैठकीला गेलो नाही तर मुसलमान आपल्याला मतदान करतील हा तर्क ज्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात घातला असेल तो आणि ते ऐकणारे उद्धव ठाकरे हे खरच साष्टांग दंडवत घालावा असे विद्वान लोक आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पहलगाम इथल्या हल्ल्याने सर्वात जास्त भयभीत तिथले स्थानिक नागरिक झाले आहेत. हे मीडियाने निर्माण केलेले चित्र खोटे आहे. 370 कलम रद्द केल्यावर संपूर्ण देशातून पर्यटकांनी काश्मीर गजबजले होते आणि स्थानिक नागरिकांना उत्तम रोजगार प्राप्त होत होता. या हल्ल्यामुळे देशभरातली नागरिकांनी केलेले बुकिंग रद्द केले असून आता कश्मीर मध्ये वर्षभर तरी पर्यटक येण्याची काहीही शक्यता नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना जगण्याचा संघर्ष निर्माण होणार आहे. अर्थात याला स्थानिक नागरिक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. मिडिया खोटे सांगतो आहे, हल्ला झाला त्यावेळी एकाही स्थानिक नागरिकाने पीडितांना मदत केली नाही. सगळे जण गम्मत बघत होते काही जण तर रडणार्‍या महिलांना पाहून हसत होते असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले आहे. स्थानिकांना हल्ला होणार आहे याची पूर्वकल्पना होती आणि म्हणूनच हल्ला झाल्यानंतर 1500 पेक्षा अधिक नागरिकांना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे. जम्मू कश्मीर मधील स्थानिक म्हणजे धुतले तांदूळ आणि पाकीस्तानातून आलेले अतिरेकी म्हणजे राक्षस हे मिडिया निर्माण करत असलेले चित्र खोटे आहे. असे हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जातच नाहीत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बीडचे नेते , गोपीनाथराव मुंडेंचे पुतणे आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे चर्चेत आलेले धनंजय मुंडे यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याचे वृत्त आहे. त्यांना अर्धांगवायुचा झटका झाला आहे. ते नीट बोलू शकत नाहीत. त्यांचे डोळे आणि चेहरा वाकडा झाला आहे. राजकीय वाद, मंत्रिपदाचा राजीनामा आणि आता प्रकृती अस्थिरता एकंदर विचार केला तर धनंजय मुंडे सध्या खऱ्या अर्थानं आयुष्यातल्या मोठ्या संकटातून जात आहेत. या जोडीला तृतीय पत्नी करुणा मुंडे यांच्या न्यायालयातील याचिकेमुळे त्यांना वैयक्तिक पातळीवर सुद्धा अनेक मानसिक क्लेशांना सामोरे जावे लागते आहे. एका होतकरू नेत्यावर अशी वेळ येणे खरोखरच दुःखद आहे. ईश्वर त्यांना लवकरात लवकर स्वस्थ करो आणि त्यांना पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल वाटप करार रद्द केला आणि त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पाकिस्तानात आग लागली आहे. सिंध मधील नद्यांचे पाणी सहा नवीन कालव्यांमार्फत पाकिस्तानातील पंजाबला नेण्याचे त्यांच्या सरकारने ठरवले आणि त्यामुळे सिंध प्रांतातील सामान्य नागरिकांनी सगळे व्यवहार आणि महामार्ग ठप्प केले आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि काही झाले तरी या निर्णयाला लागू होऊ देणार नाही अशी त्यांनी घोषणा केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य प्रमुख आणि अन्य काही लष्करातील अतिउच्च पदस्थ अधिकार्‍यांचे कुटुंब कबिले इंग्लंड मधील त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. थोडक्यात आता युद्ध अटळ आहे याची सगळ्यांनाच जाणीव झाली आहे.

🔽







 
 
 

Kommentit


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page