top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 22
  • 3 min read

Updated: Apr 23

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील सर्वात लोकप्रिय माणूस -भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, हा भारतीय जनतेच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कारण सर्वोच्च न्यायालय आणि त्याचे न्यायमूर्ती यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात खदखदत असलेली भावना अगदी उघडपणे बोलून दाखवणारा आज तो एकमेव माणूस आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांचे आरोप बरोबर की चूक सोडून द्या, पण जनतेला ते मनोमन पटले आहेत. दुबे केवळ ५६ वर्षांचे असून झारखंडमधील देवगड-गोड्डा या मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिक्षणाने ते एमबीए, पीएचडी आहेत. संसदेत उत्कृष्ट वक्तृत्व असणारा आणि अभ्यासपूर्ण बोलणारा वक्ता म्हणून दुबे प्रसिद्ध आहेत. गांधी कुटुंब, जॉर्ज सोरोस, वक्फ कायदा विरोधक वगैरेंवर ते संसदेत तुटून पडले आहेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्राने स्वतःला विकून आपला पासवर्ड दुबईच्या उद्योगपतीला कसा दिला हे त्यांनी सिद्ध केल्यामुळे महुआ हिला खासदारकी गमवावी लागली होती. आजच्या घडीला तरी निशिकांत दुबे ही भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती बनली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

हाती आलेल्या विश्वसनीय सूत्रांकडील माहितीनुसार प्रियंका चतुर्वेदी चक्क भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपा कडून राज्यसभेची खासदारकी मिळवण्याचा त्यांचा प्रयास सुरू असून याला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. एकेकाळी कोंग्रेस मधील नेत्या असणार्‍या प्रियंका चतुर्वेदींना कोंग्रेसवाले राज्यसभेत पाठवायला तयार नव्हते म्हणून त्यांनी शिवसेना उबाठा गटात उडी मारली. शिवसेना उबाठा गटाने त्यांचे जंगी स्वागत करून परप्रांतीय मंडळींना राज्यसभा खासदार करण्याची आपल्या वडिलांपासूनची परंपरा सुरू ठेवली. आता ही खासदारकी विनामूल्य दिली जात नसे हे उघड गुपित आहे. पाच वर्षे लोटली आणि प्रियांकाजींना आपल्याला पुन्हा खासदारकी दिली जाणार नाही याची कुणकुण लागली आणि त्यांनी उडी मारण्यासाठी पक्षाचा शोध सुरू केला. मध्यंतरी त्या अजित पवार गटात जाण्याची चर्चा होती परंतु आता मात्र त्यांनी थेट भाजपालाच घोळात घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र भाजपातील जुन्या , जाणत्या नेत्यांना परत एकदा पाच वर्ष सतरंज्या उचलाव्या लागून प्रियांका चतुर्वेदी त्यांच्या नाकावर टिच्चून खासदार होतात का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील समस्त कम्युनिस्ट आणि पुरोगामी मंडळी नेहमीच एका मुद्द्यावर रान माजवत असतात. ते म्हणजे भारतातील एकाही पिठाचे शंकराचार्य हे बहुजन नाहीत. सरसंघचालक बहुजन नाहीत. परंतु कोणत्याही पदावर एखादा व्यक्ती नियुक्त होणार असेल तर त्यासाठीची पात्रता आणि पूर्वअर्हता याचे जे नियम असतात त्यानुसारच व्यक्तीची निवड होते आणि एखाद्या संस्थेने पूर्वअर्हता काय ठेवावी ? पात्रता काय ठेवावी हे ठरवण्याचा अधिकार सामान्य माणसाला नसतो. परंतु हे सत्य न समजून घेता मुद्दामून अशी टीका होते. त्यामुळे आता पोपच्या मृत्युने रिकाम्या जागेसाठी हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे.

आता आतुरता पोप पदावर स्त्रीला पाहण्याची...

एखादा आशियाई पंजाबी दलीत व्यक्ती बसल्याची...

एखादा आफ्रिकन कृष्ण वर्णीय पोप बनण्याची...

या मोहिमेमुळे पुरोगामी मंडळींचा जळफळाट होतो आहे पण त्यांना सहन करायला पर्याय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

खंडणीखोरांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. जातिभेद , प्रांतभेद , भाषाभेद अश्या मुद्द्यांवरून रान पेटवणे शक्य आहे हे हेरून इतरांच्या मॅटरमध्ये पडून सेटलमेंट करून देणाऱ्या किंवा दमदाटी करणाऱ्या समाजसेवकांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. पीडित किंवा आरोपी या दोघांकडून त्या मुद्द्याला जातीवादी, धार्मिक किंवा ट्रेंडिंग विषयाचा रंग देऊन खंडणी उकळतात.असेच लोक अनेक पक्षांच्या पदाधिकारी यादीतही आहेत. काल कन्नड बोलला नाही म्हणून एका सेनाधिकार्‍याला मारहाण केल्याचे प्रकरण फिरत होते. त्यातील सत्य असे आहे की हा ऑफिसर स्वतः विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता आणि त्याने गाडीतून उतरून स्विगी डिलिव्हरी बॉयला जबरदस्त मारहाण केली. या झटापटीत त्यालाही लागल्याने त्याने यात भाषिक मुद्दा वापरून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी गाडीत आपल्या बायकोसोबत व्हिडिओ बनवला. जेव्हा एखाद्या गोष्टीवरून वाद व्हायला सुरुवात होते आणि जनमानसात या गोष्टी खोलवर रुजतात तेव्हा प्रत्येक गोष्टीत अशा वादग्रस्त मुद्द्यांचा वापर केला जातो. त्यामुळे सोशल मीडियावर दाखवली जाणारी प्रत्येक गोष्ट जाणून घेऊन मगच मत बनवणे किंवा प्रतिक्रिया देणे अधिक योग्य असेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जातीयवादाला वेसण घालण्याच्या दृष्टीने आता सरकारने हालचाल करणे आवश्यक आहे अन्यथा महाराष्ट्राचे काही खरे नाही. बीड जिल्ह्यात आता जातीवाद टोकाला गेलेला आहे; साधा वायरमन जर विजेचं बील मागायला गेला तर आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत म्हणून तुम्ही मुद्दाम बील वसूल करायला, वीज कापायला आमच्या घरी येताय; जर आमचा समाज पेटला तर तुम्हाला पळायला जागा मिळणार नाही अशा सहज धमक्या वीजबील थकवणारी लोकं देताना दिसत आहेत. अन् जर मुद्दा तापला की लगेच आपल्या जातीचा नेता हजर करून त्या वायरमन विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येते. अन् त्याची नोकरी खाल्ली जाते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला आता जातीय अँगल दिला जातोय. जातीच्या नावाखाली लोक जमा करून एक वेगळ्याच स्वरूपाची दहशत निर्माण केली जाते आहे आणि यावर कठोर कारवाई होणे खूप आवश्यक आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page