top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 22
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पश्चिम बंगाल मधील भाजपा नेते सुवेन्दू अधिकारी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुर्शिदाबाद दंगलीनंतर मुर्शिदाबाद मधील हिंदूंची एकूण लोकसंख्या निम्मी झाली आहे. बहुसंख्य हिंदूंनी प्राण वाचवण्यासाठी पलायन केले आहे. अजूनही मुर्शिदाबाद इथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाऊ दिले जात नाही. राज्यपालांना सुद्धा खूप उशिरा परवानगी दिली गेली आहे. सुवेन्दू अधिकारी यांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याची घोषणा केली असून हिंदूंना आम्ही परवानाधारक शस्त्रांचे वितरण करणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. थोडक्यात आता बंगाल मधील हिंदू स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्यावर अवलंबून न राहाता स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होतो आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याच वेळेस सामान्य हिंदूला स्वतःचे घर, प्राण आणि अब्रू वाचवण्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागत असेल तर ते संविधानाचे अपयश आहे हेच सिद्ध होते. एकांगी दृष्टीकोण ठेवणारी आपली न्यायालये यावर अंतर्मुख होऊन विचार करतील हीच आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? आले तर संजय राऊत ने दोघांची 50 -50 % स्तुती करावी असा करार होईल का ? एकत्र येण्यासाठी दोघे घराबाहेर पडतील का ? एकत्र आले तर पक्ष विलीन होतील का ? हे एकत्र येऊन निवडणूक स्वतंत्र लढवतील का महा विकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना सुद्धा सामील करून घेतले जाईल ? परंतु प्रांतवादी आंदोलन करणार्‍या राज ठाकरे यांना कोंग्रेसवाले स्वीकारतील का ? तसे प्रियंका गांधींनी विधानसभा निवडणुकीत मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल चार गौरवपूर्ण वाक्य बोलून कोंडी फोडली आहे. तरीही राज ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणे राहुल गांधींना झेपेल का ? नीतेश राणे यांनी विचारलेला कळीचा प्रश्न म्हणजे यासाठी रश्मी वहिनींचा होकार आहे का ? सगळ्यात महत्वाचा प्रश्न यामुळे मतदारराजा प्रसन्न होईल का ? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनाने निर्माण झालेले प्रश्न ऐकून वेताळ पंचविशी प्रसिद्ध राजा विक्रम सुद्धा बुचकळ्यात पडला असता. परंतू या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काल देईलच आपण तोवर संयम बाळगूया.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी प्रकरणांच्या मुळेच ओळखला जातो आहे. पिठाच्या गिरणीचा आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करणार्‍या वकील महिलेला दहाजणांनी अमानुष मारहाण केली आणि त्यात एक व्यक्ती गावचा सरपंच असल्याचे उघड झाले आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी हा गावातील सरपंच असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.या महिला वकील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात. सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली आहे."सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?", असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. कायद्याचा धाक आणि जरब बसवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय पद असलेल्या मंडळींचा अहंकार आणि गुर्मी याला कायदेशीर वेसण घातल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत हेच खरे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही परत हवी आणि नेपाळ हे हिंदू राष्ट्र घोषित केले जावे या मागणीने जोर धरला आहे. माओवादी मंडळींनी 2005 साली आंदोलन करून राजेशाही नष्ट केली. लोकशाहीची स्थापना केली. राजांना अपमानास्पद पद्धतीने पद सोडायला लावले. इतकेच नाही तर हिंदू राष्ट्र ही नेपाळची ओळख पुसून टाकून त्यांनी सेक्युलर राष्ट्र बनवले. 20 वर्षानंतर काय परिस्थिती आहे. नेपाळ मध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. भ्रष्ट लोकांवर काहीही कारवाई होत नाही. लोकशाही व्यवस्था अपयशी ठरते आहे. बेरोजगारी , महागाई याने परिस्थिती बिकट झाली आहे. नेपाळी लोक भावनिक दृष्ट्‍या भारताशी अधिक संलग्न आहे त्यांना चीनचे वाढते वर्चस्व सहन होत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीच्या वापसीचे आंदोलन प्रचंड पेटले आहे. बौद्ध आणि हिंदू हे दोन मुख्य धर्म असलेल्या नेपाळ मध्ये धार्मिक दृष्ट्‍या सुद्धा राजेशाही याच व्यवस्थेचे समर्थन असल्याने नेपाळी नागरिक याबाबतीत तीव्र भावना बाळगून आहेत. इतकेच काय नेपाळ मधील मुस्लिम नागरिक सुद्धा हिंदू राष्ट्र असतानाच आम्ही जास्त सुखी होतो आणि आमचा हिंदू राष्ट्राला पाठिंबा आहे असे म्हणत आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र पुन्हा एकदा आपल्या मूल स्वरूपाला आणि वैभवाला प्राप्त होणार यात संशय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही परत हवी आणि नेपाळ हे हिंदू राष्ट्र घोषित केले जावे या मागणीने जोर धरला आहे. माओवादी मंडळींनी 2005 साली आंदोलन करून राजेशाही नष्ट केली. लोकशाहीची स्थापना केली. राजांना अपमानास्पद पद्धतीने पद सोडायला लावले. इतकेच नाही तर हिंदू राष्ट्र ही नेपाळची ओळख पुसून टाकून त्यांनी सेक्युलर राष्ट्र बनवले. 20 वर्षानंतर काय परिस्थिती आहे. नेपाळ मध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. भ्रष्ट लोकांवर काहीही कारवाई होत नाही. लोकशाही व्यवस्था अपयशी ठरते आहे. बेरोजगारी , महागाई याने परिस्थिती बिकट झाली आहे. नेपाळी लोक भावनिक दृष्ट्‍या भारताशी अधिक संलग्न आहे त्यांना चीनचे वाढते वर्चस्व सहन होत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीच्या वापसीचे आंदोलन प्रचंड पेटले आहे. बौद्ध आणि हिंदू हे दोन मुख्य धर्म असलेल्या नेपाळ मध्ये धार्मिक दृष्ट्‍या सुद्धा राजेशाही याच व्यवस्थेचे समर्थन असल्याने नेपाळी नागरिक याबाबतीत तीव्र भावना बाळगून आहेत. इतकेच काय नेपाळ मधील मुस्लिम नागरिक सुद्धा हिंदू राष्ट्र असतानाच आम्ही जास्त सुखी होतो आणि आमचा हिंदू राष्ट्राला पाठिंबा आहे असे म्हणत आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र पुन्हा एकदा आपल्या मूल स्वरूपाला आणि वैभवाला प्राप्त होणार यात संशय नाही.

🔽

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page