🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 17
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एकनाथ शिंदे यांनी मनसेचा गेम केला का ? अशी चर्चा सध्या रंगली आहे. लोकसभेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन्ही जागा शिंदेंनी राज ठाकरेंना नाकारल्या आणि राज ठाकरेच्या उमेदवारानी शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी हा आग्रह धरला,अन राज ठाकरेंनी तो मान्य केला नाही. दोन्ही ठिकाणी महायुती जिंकू शकली असती पण मनसे वेगळी लढल्याने दोन्ही जागा गेल्या. विधानसभेला परत तेच झाले. भाजपने दक्षिण मुंबईतुन अमित ठाकरे व शिर्डी मधून बाळा नांदगावकर अशी दोन नावे मनसेला सुचवली होती,पण शिंदेंनी राज ठाकरेंना धनुष्य बाण या चिन्हावर उमेदवार उतरवण्याचा प्रस्ताव दिला अन राज ठाकरेंनी तो अमान्य केला,परिणामी शिंदेच्या हातून दोन्ही शीट तर गेल्याच पण राज ठाकरेंना ही कदाचित दुखावलं. मागे एकदा ठाणे पालिकेत राज ठाकरेचा पाठिंबा घेऊन शिंदेंनी आपला महापौर केला पण राज ठाकरेंना काही द्यायचं म्हणलं की शिंदेंनी ऐन वेळी कच खाल्ली, आता पुन्हा मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अन शिंदे यांच्यात दीड तास भेट झाली,पण या वेळी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसते हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज १६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. परंतु यावेळी भाजपाने जोरदार होमवर्क केलेले असून या कायद्याच्या समर्थनार्थ केंद्र सरकार तर आपली बाजू मांडणार आहेच परंतु भाजपा शासित 21 राज्यांनी सुद्धा या कायद्याच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून विरोधातील याचिकांवर निर्णय देण्यापूर्वी या कायद्याच्या समर्थनार्थ असलेले आमचे मत सुद्धा न्यायालयाने ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी मागणी केली आहे. या राज्यांनी म्हटले आहे की नवीन कायदा पारदर्शक, निष्पक्ष आणि व्यावहारिक आहे. कायद्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांना विरोध करत, या सर्व राज्यांनी न्यायालयाला त्यांची बाजूही ऐकून घेण्याची विनंती केली आहे. संसदीय समित्या, आंतर-मंत्रालयीन चर्चा आणि भागधारकांच्या सल्ल्यासह व्यापक कायदेविषयक आणि संस्थात्मक विचारविनिमयानंतर हा कायदा मंजूर करण्यात आला, यावर राज्यांनी भर दिला. मुख्य म्हणजे कोणतीही सुनावणी न होता जमिनी हडप करण्याची या कायद्यातील जाचक तरतूद नवीन कायद्याने नष्ट केल्याने हा सुधारित कायदा नैसर्गिक न्याय तत्वाचे संरक्षण करतो आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने याचा सुद्धा विचार करावा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कर्नाटकात कोंग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरण धोरणामुळे तिथे अक्षरशः शरिया कायदा लागू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कोंग्रेस सरकार असल्याने पोलिस यंत्रणा हतबल आहेत. कर्नाटकात एक दावणगिरी नावाचे तिथल्या डोशासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. त्या गावात शबिना बानो नावाची महिला रहाते. तिचे आणि नवर्याचे कशावरून तरी भांडण झाले. नवर्याने तिच्याविरुद्ध मशिदीत तक्रार केली. मशिदीतील मुल्लाच्या आदेशाने तिला बोलावले गेले आणि तिला मशिदीसमोर पाइप आणि बांबू घेऊन अनेक पुरुषांनी मारहाण केली. ही शरीया पद्धती आहे. मशिदींना अश्या प्रकारे न्यायालय म्हणून काम करण्याचा अधिकार फक्त शरिया कायदा देतो. कोंग्रेसच्या सत्तापिपासेचा परिणाम आहे की आज कर्नाटकातील महिला शरिया पद्धतीने शिक्षा भोगण्यास बाध्य आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या मौलाना आणि नवर्यावर अजूनपर्यंत तरी काहीही कारवाई झालेली नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आपल्या देशातील तरुणाईवर आई वडील , शिक्षण संस्था आणि समाज हे तिन्ही घटक संस्कार करण्यात किती कमी पडत आहेत याची जाणीव करून देणारा एक धक्कादायक घटनाक्रम नुकताच घडला. न्यूझिलँड मधील एक पर्यटक आणि यू ट्यूबर कार्ल रॉक सिंहगडावर गेला. तो गेले काही महीने भारतात फिरतो आहे आणि भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे तिथला इतिहास आणि संस्कृती याबद्दल माहिती देतो आहे. तो न्यूझीलंड मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. एका दृष्टीने तो भारताचा सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करतोय. त्याला सिंहगडावर काही मराठी तरुण भेटले आणि त्यांनी त्याला आपल्या संस्कृतीबद्दल सकारात्मक माहिती देणे तर दूरच त्याला मराठी भाषेतील अत्यंत अश्लील अश्या शिव्या शिकवल्या आणि हे शब्द परस्पर संवादासाठी वापरतात असे खोटेच संगितले. त्याने बिचार्याने या मुलांच्या सांगण्यावर या शब्दांचा वापर अन्य नागरिकांशी संवाद साधताना केला आणि मग त्या मुलांची टवाळखोरी त्याच्या लक्षात आली. हा सगळं प्रकार यू ट्यूब वर टाकला गेला नंतर पोलिसांनी त्या मुलांना समज दिली असून यू ट्यूबरने सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केले आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये राष्ट्रप्रेम शिकवणे किती आवश्यक आहे हे यातून अधोरेखित होते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राजकारणात कोलांट्या उड्या केवळ पुरुषच मारतात असे नाही तर बायका सुद्धा यात वस्ताद असतात. प्रियंका चतुर्वेदी ही कोंग्रेस पक्षाची सुंदर नेता आधी कोंग्रेस पक्षाची मोठी नेता होती. परंतु पक्षाच्या कार्यशैलीवर टीका केल्याने त्यांना पक्ष सोडण्याची वेळ आली. मग त्यांनी शिवसेना उबाठा गट पकडून थेट खासदारकी मिळवत राज्यसभा गाठली. ठाकरे पिता पुत्रांना त्यांनी कसे प्रसन्न केले याची कल्पना नाही. आता पुन्हा खासदारकी हवी असेल तर ठाकर्यांचे विधानसभेत तितके बळ नाही हे हेरून त्यांनी अजित पवार गटाला प्रसन्न करायला घेतले आहे आणि त्यांच्या मार्फत राज्यसभेत जाण्याचा त्यांचा प्रयास आहे. सौंदर्याचा उत्तम वापर करून राजकरणात पाय रोवणारी अनेक उदाहरणे आहेत त्यातील प्रियंका चतुर्वेदी हे ताजे उदाहरण आहे. तसे राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष यापूर्वी पासूनच सुंदर चेहर्यांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध असल्याने प्रियंकाजी यांची वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको.
🔽
#EknathShinde #MNS #RajThackeray #Shivsena #WaqfAmendmentBill #karnataka #Congress #Foreigners #newzealand #PriyankaChaturvedi #bjp #AbhijeetRane





Comments