अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 3
- 3 min read
अभिजीत राणे लिहितात
ज्यांनी मातोश्री एक सगळे नियम धाब्यावर बसवून बनवले , ज्यांनी मातोश्री दोन बनवताना देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करायला लावून राक्षसी एफ एस आय घेऊन बांधले आहे आणि ज्यांनी महापौर बंगला आपल्या वडिलांचे स्मारक या नावाखाली लाटला आहे असे उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला यात काहीही आश्चर्य नाही. कारण वक्फ बोर्ड सुद्धा अश्याच पद्धतीने सरकारी मालमत्ता हडप करण्यासाठी बनवलेली संस्था आहे. समस्त घराणेशाही वाल्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटणे आवश्यक आहे. उद्या वक्फने हडप केलेल्या प्रॉपर्टी त्यांना सुधारित कायद्यामुळे परत देण्याची वेळ आली तर तीच वेळ अश्याच एखाद्या कायद्यामुळे या राजकीय नेत्यांना सुद्धा गिळंकृत केलेल्या प्रॉपर्टी परत देण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे ही समस्त मंडळी प्राणपणाने या कायद्यातील सुधारणांना विरोध करत होती. उद्धवजींच्या डोळ्यासमोर मातोश्री होती , सोनिया गांधींच्या डोळ्यासमोर नॅशनल हारल्ड ची जमीन होती प्रत्येकासमोर अश्या आपआपल्या हडप केलेल्या मालमत्ता होत्या. मग वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला तर त्यात नवल ते काय ?
अभिजीत राणे लिहितात
भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील युवराज अनंत अंबानी हे जामनगर इथल्या आपल्या निवासस्थानापासून द्वारकेतील श्रीकृष्ण मंदिरापर्यंत पदयात्रा करत आहेत. १४० किलोमीटरचे हे अंतर ते पाच दिवसात कापणार आहेत. दमा आणि फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त असणारा हा तीशीचा तरुण आपली ईश्वराप्रति असणारी भक्ति व्यक्त करण्यासाठी ही पदयात्रा करतो आहे हे खरच कौतुकास्पद आहे. घरी प्रचंड संपत्ती आणि सर्व सुखे हात जोडून सेवेत उभी असताना सुद्धा परम श्रद्धेने पदयात्रा करत श्रीकृष्णाच्या चरणी लीन होणे यासारखे मोठे पुण्य नाही हा भाव चित्ती ठेवून अंबानी पुत्राची ही पदयात्रा भारतातील सेलिब्रिटी मंडळी आणि राजकीय नेत्यांच्या पुत्रांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे. पुरोगामित्वाचे खूळ डोक्यात असणारी आणि आम्ही श्रेष्ठ हा अहंकार असणारी मंडळी आणि त्यांची मुले ही ज्यावेळी हिंदू धर्माची टिंगल उडवण्यात गौरव समजतात त्यावेळी अंबानी पुत्र करत असलेली ही यात्रा भारतातील तरुणांना “उथळ पाण्याला खळखळाट फार” या म्हणीची नक्कीच आठवण करून देत आहे.
अभिजीत राणे लिहितात
सत्तेत असो नसो चर्चेत कसे राहायचे हे राज ठाकरे यांना नेमके माहिती आहे. बर्याचदा विरोधीपक्ष प्रतिमंत्रिमंडळ बनवतात अर्थात एकेका आमदाराला एक एक मंत्रालय दिले जाते त्याने त्या मंत्रालयाचा अभ्यास करून त्या खात्याच्या मंत्र्याला जेरीला आणणे अपेक्षित असते. ही मोहीम आरंभशूर मोहीम असते. निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होताना या घोषणा होतात, त्याचे नंतर काय होते हे कुणालाच कधीच कळत नाही. राज्यात बराच काळ महापालिका निवडणुका रेंगाळल्या आहेत त्यामुळे सर्व कारभार प्रशासनाच्या हातात आहे. याला शह देण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांनी प्रतिपालिका सभागृह निर्माण करण्याचे ठरविले आहे. यासाठी तज्ञ मंडळींची नेमणूक करून या प्रतिपालिका सभागृहाची पहिली बैठक फोर्ट इथे होणार असल्याची घोषणा केली आहे. वास्तवात तर मनसेकडे बृहन्मुंबई महापालिका ताब्यात घेण्याइतके राजकीय बळ नाही. प्रतिपालिका सभागृह या संकल्पनेच्या निमित्ताने का होईना राज ठाकरे महापालिकेवर राज्य करण्याची आपली हौस भागवून घेत आहेत इतकाच या उचापतींचा अन्वयार्थ आहे असेच म्हणावे लागेल.
अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रंप यांनी डीस्कौंटेड टेरिफ नावाच्या नवीन संकल्पनेला जन्म दिला आहे. त्यांचा मुद्दा साधा आणि सरळ आहे. जगभरातील राष्ट्रे अमेरिकेला आपली उत्पादने विकतात. अमेरिका ती खरेदी करते. परंतु अमेरिका ज्यावेळी जगभरातील देशांना आपली उत्पादने विकते त्यावेळी ते देश अमेरिकेवर आयात कर लावून त्या उत्पादनाचे देशांतर्गत बाजारात मूल्य वाढवतात जेणेकरून तीच उत्पादने बनवणार्या स्थानिक कंपन्या तग धरू शकतील. म्हणून ट्रंप यांनी जगभरातील ५० देशांना डीस्कौंटेड टेरिफ लावला आहे. या टेरिफ ची टक्केवारी १० टक्के ते ४९ टक्के इतकी आहे. या टेरिफ चे प्रमाण इतर देश अमेरिकेला जितके टेरिफ लावतात त्याच्या निम्मे आहे. उदाहरणार्थ भारत अमेरिकेला जी उत्पादने विकतो अमेरिकेने त्यावर २६ % टेरिफ लावला आहे. याचे कारण असे की भारत अमेरिकन उत्पादनांना आपल्या देशात ५२ % टेरिफ लावतो. म्हणून ट्रंप यांनी सवलत म्हणून त्याच्या पन्नास टक्के अर्थात २६ % टेरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय विचित्र वाटत असला तरी या निर्णयाने अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होणार असून जागतिक पातळीवरील अमेरिकेचा दबदबा कायम राहील.
#UddhavThackeray #shivsena #BJPGovernment #WaqfAmendmentBill #anantambani #rajthakrey #DonaldTrump #DevendraFadnavis #abhijeetrane





Comments