🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 26
- 3 min read
Updated: Mar 27





🖋️ अभिजीत राणे लिहितात
ताजमहाल हा जगातील पहिला असा चमत्कार आहे जिथे मुमताज महल ची कबर चक्क दुसर्या मजल्यावर आहे. ही कबर वगळता जगातील प्रत्येक कबर ही जमिनीलगत असते. कारण मृतदेह जमिनीत खड्डा करून गाडला जातो. वक्फ बोर्डाच्या लोभी संचालकांनी असे चमत्कार कोंग्रेस कृत वक्फ बोर्ड कायद्याच्या कृपेने आपल्या देशात ठिकठिकाणी केले आहेत. अगदी उड्डाणपुलावर सुद्धा आता थडगी दिसतात. वक्फ बोर्डाने प्रचंड प्रमाणात शासकीय जमिनी हडप केल्या असून तिथे मजार आणि दर्गा बनवून नंतर तिथे स्थलांतरित बांगलादेशी आणि रोहिंग्या मंडळींना वसवून सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचे षडयंत्र आखल्याचे उघड होते आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी याची गंभीर दखल घेतली नाही तर अत्यंत जाचक असलेल्या वक्फ कायद्यामुळे सरकारलाच जमिनी गमावण्याची नामुष्की येऊ शकते. मालवणी भाग तर मिनी पाकिस्तान झाला आहे म्हणून मागील विधानसभेत मंगलप्रसाद लोढा यांनी उघड आरोप केला होता. त्याच मालवणी मधील म्हाडाची एक जमीन वक्फ बोर्डाने हडप करून तिथे मजार बांधली. ही मजार चक्क तिसर्या मजल्यावर बांधली आहे. वक्फ बोर्ड कायदा कचराकुंडीत फेकून देऊन त्यांनी लाटलेल्या सगळ्या जमिनी मूळ मालकांना देणे अत्यंत आवश्यक आहे. मुसलमान धर्ममार्तंड मंडळी ही शब्दशः लुटारू आहेत आणि हे वारंवार सिद्ध होते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र पोलिसांना थोडे अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पहिल्यांदा युती सरकार आले होते त्यावेळी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी भरपूर एंकाऊंटर केले परंतु एकही प्रकरण कायद्याच्या कचाट्यात सापडले नाही. योगींनी इतक्या ठिकाणी बुलडोजर चालवला , इतक्या गुंडांना ढगात पाठवले परंतु एकही प्रकरण कायद्याच्या कचाट्यात सापडले नाही. तेलंगणा मध्ये महिलेवर बलात्कार आणि खून झाला, जनमानस संतपत आहे हे बघून एंकाऊंटर मध्ये गुन्हेगार ठोकले गेले प्रकरण कायद्याच्या कचाट्यात आले नाही. महाराष्ट्रात बदलापूर मधील एंकाऊंटर प्रकरण आणि नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे प्रकरण या दोन्ही प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिस उत्साहाच्या भरात आणि कायदेशीर तरतुदींची पूर्तता न करता कारवाई करत आहेत असे सिद्धा होते. त्यामुळे पोलिसांनी उत्तर प्रदेश दौरा करून तिथल्या पोलिसांची कार्यपद्धती जाणून घेऊन तिचाच वापर महाराष्ट्रात सुरू केला तर महाराष्ट्र सुद्धा लवकरच गुन्हेगारी मुक्त होईल यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शरद पवारांच्या मार्गावर चालत आहेत आणि तशीच कुप्रसिद्धी मिळवत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन. वाजपेयी सरकारवर अविश्वास ठराव आला होता आणि त्यातून वाजपेयी सरकार तरून गेले सुद्धा असते. परंतु तत्कालीन विरोधीपक्ष नेता शरद पवारांनी भरपूर काड्या केल्या आणि वाजपेयी सरकार पाडले. त्यावेळी संसदेत भाषण करताना भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी पवारांचा उल्लेख “ये शरद पवार नही ललिता पवार है” असा केला होता आणि पवारांसह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले होते. ललिता पवार यांनी रामायणात मंथरेची भूमिका केली होती. भाजपा मंत्री जयकुमार गोरे यांना असेच अडकवण्याचे षडयंत्र सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले गेले परंतु ती महिला पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात खंडणी मागताना अलगद सापडली. ही सर्व माहिती विधानसभेत देवेन्द्रजींनी दिली आणि सुप्रिया ताईंना सल्ला दिला “तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये आत्याचा रोल करायला जा. टीव्ही सिरियल मधील आत्या सुद्धा अश्याच कायम षडयंत्र रचत असतात.” देवेन्द्रजींच्या या वक्तव्याने संपूर्ण विधानसभा हास्य कल्लोळात बुडाली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कुलाला कलंक म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हुसेन दलवाई यांच्याकडे बघावे लागेल. हुसेन दलवाई हे हमीद दलवाई यांचे पुतणे आहेत. बाळासाहेबांचा पुतण्या राज हा बर्याच प्रमाणात बाळासाहेबांच्या पायावर पाय ठेवून वाटचाल करतो आहे परंतु हुसेन दलवाई यांनी मात्र आपल्या काकाचे नाव मातीत मिळवण्याची प्रतिज्ञा केलेली दिसते.हमीद दलवाई संपूर्ण आयुष्यभर मुसलमान समाजाचा विकास व्हावा, ते कालसुसंगत व्हावेत आणि मौलवींच्या तावडीतून मुक्त व्हावे , प्रत्येक मुसलमान नागरिक प्रगतिशील व्हावा यादृष्टीने झटले आहेत. सत्तरच्या दशकात मुस्लिम महिलांना घेऊन “आम्हाला समान नागरी कायदा हवा” असे फलक घेतलेले मोर्चे काढायचे धाडस हमीद दलवाई यांनी दाखवलं होतं. अशा थोर विचारवंताच्या कुळात जन्माला आलेला मुलगा हा स्वधर्मियांना प्रागतिक दृष्टी देणारा हवा. परंतु हुसेन दलवाई मात्र औरंग्याचे समर्थन करण्याच्या नादात सगळे विसरून गेले आहेत. “औरंग्याने ब्राम्हणाच्या सांगण्यावरून मनुस्मृतीनुसार संभाजी राजांची हत्या केली.” असे धादांत असत्य विधान करून त्यांनी आपली लायकी दाखवून दिली आहे. मंनूस्मृतीत अश्या मूर्खपणाला आणि क्रौर्याला शून्य स्थान आहे. हुसेन भाई यांनी तत्कालीन बखरा वाचल्या असत्या तर अशी बाष्कळ बडबड केली नसती.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दिशा सलियन हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जे काही आरोप केले आहेत त्याला समस्त मीडियाकडून मोठ्या प्रमाणात कव्हर केले जाते आहे. परंतु या संदर्भातील सत्य म्हणजे सरकारने आपल्या मीडियाला सरकारने चघळायला दिलेलं हे हाडूक आहे. ही घटना ज्यावेळी घडली त्या वेळेला महाविकास आघाडीचे सरकार होते. आदित्य ठाकरे हे त्या सरकारमधील मंत्री होते आणि जर चुकून त्यांचा या प्रकरणांमध्ये सहभाग असेल तर त्या संदर्भातील जे काय पुरावे असतील ते त्याच वेळी नष्ट झाले असतील. त्यामुळे आत्ता त्यांच्यावरील आरोपांवरची चर्चा म्हणजे साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. जे काय आरोप केले जात आहेत यापैकी कोणतीही गोष्ट न्यायालयात सिद्ध होणे अत्यंत कठीण आहे. सध्याचे पत्रकार हे श्वान स्वरूप असल्यामुळे त्यांना अशी हाडके चघळायला दिली की त्यांचा पण त्यात वेळ जातो आणि त्यामध्ये रममाण होऊन ते सरकारवर भुंकायचं विसरतात.
🔽
Comments