top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 25
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

समाजवादी पार्टीने स्वतःचे नाव बदलून मुस्लिम लीग करून घ्यायला हरकत नाही. 2027 ला उत्तर परदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांना बहुदा फक्त मुस्लिम मतांचीच गरज आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील नेते अबु आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्यांना विधानसभेच्या या सत्रातून निलंबित केले गेले. आता समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा संगा या सुप्रसिद्ध योद्ध्याबद्दल तो देशद्रोही होता असे वक्तव्य केल्याने आग लागली आहे. यात पाणी टाकायचे सोडून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत अवमानास्पद बोलला आहे. थोडक्यात हिंदूंसाठी आदरणीय असणार्‍या विभूतींवर घाणेरड्या भाषेत टीका करून त्यांना दुखावणे , कायद्यातील तरतुदींचा लाभ घेत अश्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास होईल तो टाळणे आणि याबदल्यात मुस्लिम समाजाला आम्हीच तुमचे तारणहार असे दाखवून मत मिळवणे असा अजेंडा राबवला जातो आहे. हे लोक राजकरणी नाही समाजकंटक आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पंजाबमधील आंदोलनजीवी शेतकर्‍यांनी गेले दोन तीन महीने पंजाबच्या सीमेवर आंदोलन चालवले होते त्यामुळे तिथले व्यापारी आणि उद्योजक संतापले त्यांनी पंजाब सरकारला भविष्यात निधि देणार नाही अशी धमकी दिल्याने या आंदोलनजीवी शेतकर्‍यांवर सरकारने लाठीचार्ज केला आणि त्यांना पळवून लावले. या दोन महिन्यात या आंदोलनजीवी शेतकरी मंडळींनी तंबू , खाण्यापिण्याचे सामान , फ्रीज , टीव्ही , एयर कंडिशनर आणि ट्रॅक्टर असे बरेच काही आणून तिथे वस्तीच केली होती. सरकारने हे आंदोलन चिरडले आणि या नकली शेतकर्‍यांना हाकलून दिले , पोलिसांशी हुज्जत घालणारी मंडळी तुरुंगात पोचली आणि हे सगळे सामान पोलिसांनी जप्त केले. आता या आंदोलनकारी मंडळींनी वेगळाच आरोप केला आहे. पंजाब पोलिसांनी जप्त केलेले सामान आम आदमी पार्टीच्या पंजाब मधील नेत्यांनी लंपास केले असून हे आम्हाला परत मिळाले पाहिजे. सगळा प्रकार हास्यास्पद आहे. खरा शेतकरी इतका दीर्घकाळ कधीच आंदोलन करत नाही करू शकत नाही. हे खोटे शेतकरी आहेत यात संशय नाही. या मंडळींना पैसे देऊन आंदोलन करायला बसवले आहे हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी अश्या पद्धतीने आंदोलन करायला बसवले ते अर्थातच यांची उत्तम बडदास्त ठेवणार त्यामुळे फ्रीज आणि ए सी आणले गेले. आता ते पोलिसांच्या ताब्यातून सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी गायब करणे म्हणजे चोरावर मोर होणे आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानास्पद बोलणारा आणि इंद्रजीत सावंतला धमकावणारा प्रशांत कोरटकर अखेरीस तेलंगणात कोंग्रेसी नेत्याच्या घरात पकडला गेला. प्रशांत कोरटकर याने अभिरुचीहीन वक्तव्य केल्यावर त्याला अटक करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तत्काल कारवाई सुरू केली परंतु त्याने उपलब्ध असणार्‍या सर्व कायदेशीर पळवाटा वापरुन पोलिसांना गुंगारा दिला. शेवटी अटकेचा आदेश निघाल्यावर राज्यातील कोंग्रेस नेत्यांची मदत घेऊन महाराजांनी तेलंगणा गाठला आणि तिथल्या कोंग्रेसी नेत्याच्या घरात मुक्काम ठोकला. कोंग्रेसी मंडळींनी षडयंत्र करून त्याला फरार केले आणि दुसरीकडे तो दुबईला पळून गेला अशी आवई उठवली आणि त्यामुळे फडणवीस सरकारवर लोक तुटून पडले. परंतु पोलिसांनी संयमाने त्याला अटक करण्यात यश मिळवली आहे. आता त्याच्यावर कारवाई होईल यात संशय नाही. परंतु फडणवीस सरकारने त्याच्यावर थर्ड डिग्री वापरुन त्याच्या पलायनाला मदत करणार्‍या कोंग्रेसी नेत्यांची कुंडली प्राप्त करावी आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी. गुन्हेगाराला संरक्षण देणे हा सुद्धा कायद्याने गुन्हाच आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज्यपातळीवरील घराणेशाहीचा आजवरचा सर्वात हिडीस चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. केंद्रात हा बहुमान निःसंशयपणे राहुल गांधी यांच्याकडे जाईल. घराणेशाही मधील पुत्र हे स्वतःला राज्य करण्यासाठी जन्माला आलो आहोत असे समजतात. समोरच्या प्रत्येक व्यक्तिला आपला गुलाम समजतात. लोकांनी आजन्म माझी गुलामी करावी अशीच त्यांची इच्छा असते. यांना कोणी विरोध केला की ते निर्दयी होऊन त्यांचा निःपात करतात आणि यांच्या विरोधात कोणी उभे राहिले तर यांना ते सहन होत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नौदल अधिकार्‍याला मारहाण केली, पोलिसांना हाताशी धरून त्यांनी अर्णब गोस्वामी आणि केतकी चितळे हिला तुरुंगात डांबले. कंगणा रानावत चे त्यांनी घर तोडले. केंद्रीय मंत्र्‍याला जेवण करत असताना उचलून तुरुंगात टाकले. या सगळ्यांचा एकच अपराध होता त्यांनी उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्‍यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. आज एकनाथ शिंद उपमुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी सुपारी देऊन कुणाल कामराला शिंदेयांच्यावर अभिरुचीहीन टीका करायला लावली आणि मग संतप्त शिवसैनिकांनी त्याचा स्टुडियो फोडला तर मिडिया समोर येऊन उद्धव ठाकरे जगाला अक्कल शिकवत आहेत. आपण सत्ताधीश असताना काय केले ? असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्शत नाही कारण त्यांच्यामते ते श्रेष्ठ असून बाकी सगळे जग त्यांचे गुलाम आहे. ही प्रवुत्ती संपवणार्‍या मतदारांचे मनापासून आभार.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. किल्ल्याच्या पवित्र स्थानी उभारण्यात आलेले वाघ्या कुत्र्याचे स्मारक गेल्या काही दशकांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. इतिहासाचा आधार घेतल्यास, वाघ्याच्या अस्तित्वाचा किंवा त्याच्या शिवाजी महाराजांवरील निष्ठेचा कोणताही ठोस पुरावा सापडत नाही. त्यामुळे, या स्मारकाचा ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. एखादा प्रसंग लोककथांमधून प्रसिद्ध झाला असला, तरी त्याला ऐतिहासिक मान्यता नसल्यास, त्याला अधिकृत स्वरूप देणे योग्य ठरणार नाही.

रायगड हा केवळ एक किल्ला नसून तो स्वराज्याचा आत्मा आहे. त्यामुळे, येथे स्थापित प्रत्येक स्मारक हे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि मराठ्यांच्या शौर्याचा खरा वारसा सांगणारे असावे. जर वाघ्या स्मारकाला ऐतिहासिक आधार नसेल, तर त्याऐवजी इतिहासात मोठे कार्य केलेल्या वीरपुरुषांचे किंवा स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या महान व्यक्तींचे स्मारक उभारणे अधिक उचित ठरेल. यामुळे शिवरायांचा वारसा अधिक गौरवशाली होईल आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल.रायगड किल्ल्यावरील प्रत्येक स्मारकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तविक इतिहासाचे प्रतिनिधित्व करायला हवे. भावनात्मक श्रद्धेपेक्षा ऐतिहासिक सत्याला प्राधान्य दिले पाहिजे, ज्यामुळे भविष्यात चुकीची माहिती पसरू नये.

🔽

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page