🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 20
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उथळ मिडिया आणि त्यांना खेळवणारे हुशार हा सामना कधीकधी अंगलट येतो. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण झाल्याची बातमी मीडियाने देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. साहिल डोंगरे यांचे अपहरण करून 20-22 लोकांनी त्यांना प्रचंड मारहाण करून दिवे घाटात फेकून दिल्याची बातमी प्रसारमाध्यमे अहमहमिकेने सांगत सुटले होते. परंतु पोलिसांनी तपास सुरू केल्यावर वेगळेच सत्य उघड झाले. हे वकील महोदय आपल्या मित्रासह दिवे घाटा जवळील एका बार मधून मद्यपान करून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा अपघात झाला. त्या अवस्थेत त्यांनी पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन सुद्धा लावला आणि नंतर ते उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले. उथळ मीडियाने आणि कदाचित वकील साहेबांच्या काही हितचिंतकांनी हे प्रकरण अपहरण म्हणून रंगवले परंतु पोलिस तपासात हे बिंग उघडकीस आले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड भोवतालचा फास आवळत चालला आहे. संतोष देशमुख प्रकरणाची न्यायलाईन सुनावणी सुरू झाली असून त्यात आवादा कंपांनीच्या तिन्ही सुरक्षा रक्षकांनी आपली साक्ष दिली आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणाने घडलेला घटनाक्रम नमूद केला. सुदर्शन घुले आणि अन्य मंडळी खंडणी मागण्यासाठी कंपनीच्या गेट वर आली होती. त्यांनी खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करू अशी धमकी दिली. त्यावेळी सरपंच संतोष देशमुख तिथे आले त्यांनी याला विरोध केला. कंपनी बंद झाली तर स्थानिकांचा रोजगार बुडेल अशी त्यांची भूमिका होती. खंडणीखोरांनी उघड उघड वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन खंडणी मागितली आणि उघड उघड संतोष देशमुख यांना खून करण्याची धमकी दिल्याचे सदरील सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यामुळे या प्रकरणातील वाल्मिक कराड यांचा सहभाग उघड झाला आहे. अर्थात त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा मिळू शकते. संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात स्थानिक गुंड मंडळी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने खंडणीखोरी करत असतात. अश्या काही गुन्हेगारांना अजित पवारांनी मोक्का सुद्धा लावला होता आणि काही जणांना एंकाऊंटर करून मारून टाकेन अशी धमकी सुद्धा दिली होती. आता सुद्धा देवेन्द्रजींनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी संपुष्टात आणणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नागपूर दंगल ही पूर्वनियोजित होती. एखादे तात्कालिक कारण शोधून हिंसाचार घडवणे हेच दंगलखोरांचे नियोजन होते. बहुसंख्य मंडळींनी एक मुद्दा दुर्लक्षित केला आहे तो म्हणजे ज्यावेळी डोनाल्ड ट्रंप भारतात होते त्यावेळी दिल्ली दंगल घडवली गेली. त्याच प्रमाणे ज्या दिवशी अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार तुलसी गेरार्ड भारतात होत्या त्याच दिवशी नागपूर दंगल घडवली गेली. हे षडयंत्र उघड होऊ नये म्हणून औरंग्याच्या कबरीची प्रतिकृती जाळली हे कारण उकरून काढले गेले आहे. सरकारने या सापळ्यात अडकू नये. दुर्दैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सापळ्यात अलगद अडकला आहे. त्यांनी नागपूर दंगल झाल्यावर औरंग्याची कबर हा मुद्दा फारसा महत्वाचा नाही असे मत प्रदर्शित करून हिंदूंच्या भावनांचा विचार न करता नेमस्त भूमिका घेतली आहे. संघाच्या या भूमिकेचे कोंग्रेसने अर्थातच स्वागत केले आहे. परंतु सत्य असे आहे की छवा चित्रपटाच्या मुळे औरंग्याबद्दल उभ्या देशात जी संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे प्रत्येकाला औरंग्याचे धडगे उध्वस्त झालेलेच पहायचे आहे. त्यामुळे संघाची भूमिका काहीही असो सर्वसामान्य हिंदूंची मागणी औरंग्याचे थडगे उध्वस्त करा हीच आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रशिया आणि युक्रेन युद्ध पेटल्यावर भारत सरकारने याचा निषेध केला नाही. अत्यंत शांत आणि सयंत भूमिका घेत भारताने दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भारत सरकारच्या या भूमिकेचा कोंग्रेस पक्षाने आणि खास करून शशी थरूर यांनी कडाडून विरोध केला. रशिया युक्रेन युद्धात युक्रेन हे छोटे राष्ट्र आहे आणि त्याच्या समर्थनार्थ भारताने उभे राहिले पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली होती. भारत नेहमीच कमकुवत देशांच्या पाठीशी उभा राहिला आहे परंतु या परराष्ट्र धोरणाला मोदी छेद देत आहेत असा आरोप थरूर यांनी केला होता. परंतु आज तीन वर्षांच्यानंतर त्यांना आपली भूमिका चुकीची होती हा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी प्रामाणिकपणे आपली ही चूक कबूल केली असून माझे मत चुकीचे होते आणि मोदी सरकारने आखलेले धोरण पूर्ण योग्य होते आणि या धोरणामुळेच आज भारत हा रशिया युक्रेन युद्ध सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावतो आहे असेही त्यांनी मत मांडले. आपली सैद्धांतिक चूक मान्य करायला मोठे मन लागते थरूर आंतरराष्ट्रीय संबंधातील तज्ञ आहेत आणि त्यांनी हा दिलदारपणा दाखवला. दुर्दैवाने कोंग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी तितक्या मानसिक प्रगल्भतेने कधीही वर्तन करत नाहीत. शशी थरूर यांच्याकडून चार चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रामाणिकपणा राहुल गांधी दाखवतील का ?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कासारवडवली या गावात तब्बल दोन मजली बेकायदेशीर इमारत एक जागा हडप करून बांधली गेली. ही इमारत ग्रामपंचायत असताना बांधली गेली परंतु बेकायदेशीर असल्याने त्या मशिदीची नोंद झाली नाही. नंतर हे गाव ठाणे महापालिकेच्या हद्दीत आले. ही बेकायदेशीर इमारत पाडली जावी म्हणून अनेकदा विनंती करूनही ठाणे महापालिकेने पाडली नाही. शेवटी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. न्यायालयाने या संदर्भात ठाणे महापालिकेची खरडपट्टी काढली असून ही इमारत तातडीने जमीनदोस्त करा असा आदेश दिला आहे. केवळ ठाणे महापालिकाच नाही तर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट कर्मचारी आपले इमान या मुसलमानांना विकतात आणि सरकारी जमिनी हडप करून तिथे बेकायदेशीर मशिदी उभ्या रहातात. बेकायदेशीर मशीद बनवली की त्याच्या आजूबाजूला बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशी वसवले जातात. हे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्याची गरज आहे. राज्यात महायुतीचे शासन आल्यावर आता या गोष्टीला अग्रक्रमाने प्राधान्य देणे आवश्यक आहे.
🔽
Commenti