🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 18
- 3 min read
Updated: Mar 19
🖋️ अभिजीत राणे लिहितात
तुम्ही जे पेरता तेच उगवते हा जगाचा नियम आहे. भारतात गेली कित्येक वर्ष दहशतवाद पोसणारा पाकिस्तान आता त्याच आगीची धग सहन करतो आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान विरुद्ध अक्षरशः युद्ध पुकारले आहे. गेल्या आठवड्यात १००० पेक्षा अधिक नागरिक आणि सैनिक या भागात मारले गेले आहेत. पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४४ टक्के क्षेत्रफळ बलुचिस्तानचे आहे आणि इथे पाय ठेवणे म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे अशीच पाकिस्तानी सैनिकांची भावना झाली आहे. गेल्या आठवड्यात या भागात कार्यरत असणार्या जवानांच्या पैकी तब्बल २५०० जवानांनी नोकरीचा त्याग केला असून ते आपल्या घरी परत जाणार आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी शी लढून मरण्यापेक्षा नोकरी सोडणे पाकिस्तानी सैनिकांना सोपे वाटत आहे यावरून तिथल्या परिस्थितीच अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी अधिकार्यांनी या सगळ्याचे खापर भारतीय गुप्तचर संस्था आणि अफगाणिस्तान मधील सरकारवर फोडले असले तरी पाकिस्तानने इतकी वर्ष बलुचिस्तानचे जे शोषण केले आहे त्याचीच ही प्रतिक्रिया आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नागपुरमधील दंगल पूर्वनियोजित आणि सूनियोजित होती का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जर इतक्या सुनियोजित पद्धतीने दंगल केली जात असेल तर राज्याचे गुप्तहेर खाते नक्की काय करते आहे ? हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. दोन गटात तनाव निर्माण झाला आणि शांतता प्रस्थापित करणार्या पोलिसांवरच एक जमाव तुटून पडला. ज्यात पोलिस जखमी झाले. अतिरिक्त कुमक आल्यावर शांतता निर्माण झाली. पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केल्यावर अंतर्गत वसाहतीतील छतांवरून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. मोठमोठे दगड , टाईल्स चे अणकुचीदार तुकडे , लाकडी दांडके रस्त्यावर आढळून आले. या दगडफेकीत पोलिस उपायुक्त गंभीर जखमी आले आहेत , पोलिस आयुक्त सुद्धा जखमी झाले आहेत आणि अनेक पोलिस कर्मचारी सुद्धा जखमी झाले होते. शेकडो दुचाकी फोडल्या आहेत. एका कार मध्ये १० -१० किलोचे दगड घालून ती फोडली आणि मग पेटवून देण्याचा प्रयास झाला आहे. संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघता हा प्रकार पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग तर नाही ना , याची चौकशी केली जाणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खयालीस्तानी अर्थात खलीस्तानी विचारसरणी पंजाबच्या भूमीत परत रुजण्याचा प्रयास करते आहे का ? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे. अमृतसरच्या खंडवाल परिसरातील ठाकूरद्वारा मंदिरावर हल्लेखोरांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्ती मंदिराबाहेर थांबून त्यांच्यापैकी एकाने स्फोटक यंत्र फेकले. रात्री १२. ३५ च्या सुमारास झालेल्या या शक्तीशाली स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान कोणतीही एक जीवितहानी झाली नाही. आरोपी राजासांसी परिसरात फिरत असल्याचे समजताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीआयए आणि छेहरता पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना घेरले आणि त्यावेळी झालेल्या चकमकीत गोळी लागली आणि नंतर तो रुग्णालयात उपचारा दरम्यान मरण पावला. त्याचा साथीदार विशालला पळून जाण्यात यश आले. सदरील गुन्हेगारांना पाकीस्तांनातून शस्त्रास्त्रे मिळाल्याचा संशय आहे. परंतु शिखांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करणे हे खूप धक्कादायक आहे कारण शीख संप्रदाय ही हिंदू धर्माचीच शाखा आहे. अश्याच पद्धतीने हिंदू मंदिरांवर खलीस्तानी विचारसरणीच्या लोकांनी कॅनडा आणि अमेरिकेत पण हल्ला चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्वा याच लोकांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रवास केला होता. देशाच्या मुळावर आलेल्या या किडीचा कठोर बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सरकारी कर्मचारी हे अस्तंनीतील साप आहेत का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील जनता विचारते आहे. महाराष्ट्रात वर्ष २०२४ मध्ये नायब तहसीलदारांनी अधिकार नसताना बेकायदेशीररित्या सुमारे ४० हजार जन्म प्रमाणपत्र दिले. त्यात अकोला, अमरावती, नागपूर, मालेगाव, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांनी बेकायदेशीररित्या दिलेले हे ४० हजार जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यात दिनांक ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांपैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेत ते प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून फेरतपासणी करून त्यावर निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. भारतात घुसलेले रोहिङ्ग्या आणि बांगलादेशी अश्या पद्धतीने आपल्या मुलांना जन्माला घालून आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळवून स्वतःला भारताचे नागरिक बनवायचा प्रयास करतात. या बेकायदेशीर कृत्याला राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी साथ देतात. हे षडयंत्र उघड झाले असून शासनाने ही प्रमाणपत्रे रद्द केली आहेत परंतु या नायब तहसीलदारांना नोकरीवरून काढून टाकणे सुद्धा आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
औरंग्याची कबर हा विषय हळूहळू पेटू लागला आहे. कोल्हापुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंग्याची प्रतिकात्मक कबर आणि फोटो आणून ते पेटवून दिले. याबद्दल एक खोटी अफवा निर्माण केली जाऊन नागपुर मध्ये दंगल भडकली. दुसरीकडे तेलंगण भाजपाचे फायरब्राण्ड नेता टी राजा यांनी थेट केंद्रीय मंत्र्याला पत्र लिहून विचारणा केली आहे की ज्या राज्यकर्त्याने हिंदूंवर अत्याचार केले , मंदिरे उध्वस्त केली त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी सरकारी पैसा का खर्च केला जातो आहे ? जनतेकडून करांच्या रूपाने वसूल केलेल्या रकमेची ही उधळपट्टी तत्काल थांबवली जावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी तर हा थेट आस्थेचा विषय बनवला आहे. औरंग्या त्याच्या मातीच्या कबरीत निवांत पडून होता. निजामाच्या काळातील थोडीफार सजावट वगळता ती कबर दुर्लक्षित होती. परंतु सुप्रिया सुळे यांच्याच राजकीय पक्षाने त्याला सूफी संत घोषित केले. तिथे जोरदार सजावट सुरू केली. अबु आजमी , मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या मंडळींनी जाऊन तो विषय मोठा केला. त्यांच्या दुर्दैवाने छावा चित्रपट आला आणि मग आता औरंग्याची कबर आणि त्याचे उदात्तीकरण हिंदूंच्या डोळ्यात सलू लागले.
🔽





Commentaires