top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 16
  • 9 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"त्या "महिलेचा ट्रॅप आज पर्यंत केलेली फसवणूक आणि कारनामे


1) ज्या महिलेने पृथ्वीराज पाटील यांचेवर आरोप केले आहेत त्या महिलेने आजपर्यंत 7 ते 8 लोकांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. आणि पैसे उकळले आहेत. मग या महिलेची नेमकी विश्वासार्हता काय आहे?


2) 1 ऑगस्ट 2024 रोजी टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकातील एक बातमी, त्याचा सारांश असा,

एका महिलेच्या घटस्पोट प्रकरणात ठाण्यातील 60 वर्षे वयाच्या एका राजकीय व्यक्तीने या महिलेला मदत केली. पण या व्यक्तीच्या विरोधातच लैंगिक छळाची तक्रार या महिलेने केली. या पुढे जाऊन या प्रकरणात वकिल असलेल्या देशमुख नावाच्या वकिला विरोधातही अशाच प्रकारची तक्रार या महिलेने केली. या वकिलांना पोलीस कोठडी सुध्दा भोगावी लागली. पण या वकिलांनी ज्या दिवशी या महिलेने आपल्यावर गाडीत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे त्या दिवशी आपण दिल्लीतील सुप्रिम कोर्टात होतो. ज्या कारमध्ये अत्याचार झाला असे नमुद केले ती कार सुध्दा आपल्या ऑफीसच्या दारात होती, याचे पुरावे दिले. संबंधित महिलेने देशमुखांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे व रचलेला बनाव असलेले सिध्द झालेने न्यायालयाने संबंधित वकिलांना तात्काळ दोषमुक्त केले होते. या प्रकरणातील तक्रारदार महिला सुध्दा हिच होती, अशी माहिती आहे.


3) ही महिला कोल्हापूरातील आपल्या आजीकडे राहत असताना त्या ठिकाणी असलेल्या एका कुळाने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार तिने दाखल केली होती, अशी माहिती आहे.


4) कोल्हापूरातीलच एका डॉक्टरला संपत्तीसाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्नही या महिलेने केल्याची माहिती आहे.


5) एखाद्या व्यक्तीची बदनामी करुन पैसे उकळण्याच्या उद्देशानेच संबंधित महिलेने हा सर्व उपदव्याप केला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

फर्दापूर , संभल का भाग्यनगर; तुम्हाला कुठे राहायचे आहे ?

काल संपूर्ण देशभर उत्साहात धुळवडीचा सण साजरा झाला. सगळीकडे उत्साह आनंद आणि रंगांची उधळण होती. परंतु आपल्या देशातील असंतुष्ट मंडळींनी या सणाला गालबोट लावण्यात कोणतीच कसर सोडली नाही. देशभरातली अनेक ठिकाणी मशि‍दींवर ताड्पत्रींनी आच्छादन केले होते आणि हे दृश्य अत्यंत खोडसाळपणाने मिडिया वारंवार दाखवत होता. इस्लाम हा एक परस्परविरोधी विचारांनी संभ्रमित संप्रदाय आहे हे अजून एकदा सिद्ध झाले त्याच प्रमाणे आपल्या देशातील विचारवंत, पत्रकार आणि मिडिया हा विघ्नसंतोषी असल्याचे सिद्ध झाले.

मुस्लिमांची मानसिकता समजून घ्यायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी मेंदूत कोरून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट. इस्लाम हा धर्म , रिलीजन नसून एक राजकीय संप्रदाय आहे किंवा राजकीय पक्ष आहे, राजकीय सैन्य असा शब्द वापरला तरी तो योग्यच असेल. जिथे मुस्लिमांची संख्या कमी असते तिथे ते सर्वधर्मसमभाव , भाईचारा अश्या शब्दांचा उल्लेख आणि वापर करत सौहार्दपूर्ण वर्तन करतात. जिथे त्यांची संख्या जास्त होते तिथे ते आपले कायदे लागू करणे अन्य धर्मियांना त्रास देणे हे उद्योग सुरू करतात. कालच्या होळीच्या निमित्ताने काही गोष्टी प्रत्येक हिंदूने आत्मसात करणे आवश्यक असेल.

उदाहरण क्रमांक 1

सिल्लोड तालुक्यातील फर्दापूर नावाचे गाव. इथे मुस्लिम बहुसंख्यांक आहेत. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मागील वर्ष आणि या वर्षी सुद्धा फर्दापूर मध्ये होळी साजरी करू दिली जात नाही. यावर्षी तर रमजानचा महिना सुरू आहे त्यामुळे तर पोलिस प्रशासनाने हिंदूंना होळी साजरी करण्यापासून केवळ रोखलेच नाही तर होळी साजरी करण्याची परवानगी घेऊन या असे बेमुवर्तखोर पणे तिथला पोलिस अधिकारी बोलताना दिसतो आहे. याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

आता प्रश्न असा आहे महाराष्ट्र शासन याची दखल घेणार आहे का ? अब्दुल सत्तार यांना वेसण घालण्याचे काम एकनाथ शिंदे करणार आहेत का ?

उदाहरण क्रमांक 2

संभल इथे गेली 46 वर्ष होळी साजरी होऊ शकली नाही कारण तिथे मुस्लिम बहुसंख्यांक आहेत. इथल्या हिंदूंना जीव मुठीत धरून जगावे लागत होते किंवा संभल सोडून पळ काढावा लागत होता. या वर्षी योगी आदित्यनाथ यांनी इथल्या मुसलमान गुंडांना आणि आमदारांना कायद्याचा दणका देऊन सरळ केले, संभल इथल्या मशिदीत हिंदू मंदिराचे पुरावे आहेत हे कायदेशीरदृष्ट्या सिद्ध केले आणि आता कोर्टाने ती वास्तु वादग्रस्त वास्तु आहे असे घोषित केले आहे. यावर्षी पोलिसांच्या संरक्षणात सगळ्या मशि‍दींवर ताडपत्री टाकल्या गेल्या आणि दणक्यात होळी साजरी झाली.

याचा अर्थ काय ?

जिथे मुस्लिम बहुसंख्यांक असतील तिथे हिंदूंना प्रशासन पाठीशी असेल तर आणि तरच जगता येते. संपूर्ण मिडिया मशिदी झाकल्या आहेत हे शंभर वेळा सांगत होता वारंवार दाखवत होता परंतु गेली 46 वर्ष इथले हिंदू होळी साजरी करू शकले नाहीत हे एकाही मीडियातील पत्रकाराच्या तोंडातून निघाले नाही. भारताचा संपूर्ण मिडिया कट्टर हिंदू द्वेष्टा आहे आणि हे त्यांच्या वर्तनातून ते वारंवार सिद्ध करत असतात.

उदाहरण क्रमांक 3

हैदराबाद शहर. निजामाची राजवट असणारे मुस्लिम बहुसंख्यांक शहर. इथला चारमिनार प्रसिद्ध आहे. या चारमीनार च्या एका पायाला लागून एक भाग्यलक्ष्मी मंदिर आहे. असे मानले जाते की ती या भाग्यनगरची ग्रामदेवता आहे. निजामाच्या अत्याचारांनी विद्ध होऊन ती शहर सोडून जात होती परंतु एका हिंदू रक्षकाने तिला विनंती करून थांबवले. निजामाने त्या रक्षकाचा जीव घेतला आणि त्यामुळे ती त्याची वाट पहात भाग्यनगरच्या तत्कालीन वेशीवर थांबली आहे. ही देवी गावाच्या वेशीवर आहे तोवर हैदराबाद उर्फ भाग्यनगर मध्ये समृद्धी आहे असा सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे ओवेसी बंधु देशभर कितीही मर्दुमकीच्या गप्पा मारत असले तरी या मंदिराला हात लावण्याची त्यांची हिम्मत नाही. कारण ही चूक केली तर जो वडवानल पेटेल त्याला आवरणे आपल्याला अशक्य आहे याची त्यांना कल्पना आहे.

त्याच प्रमाणे हैदराबाद मध्ये गणेश विसर्जनाच्या दिवही गेली कित्येक वर्षे मशि‍दींवर ताडपत्री टाकली जाते कारण तिथल्या हिंदूंनी स्पष्टपणे संगितले आहे गणेशाचे विसर्जन हे गुलाल उधळतच केले जाणार आहे. मशि‍दींवर उडू नये असे वाटत असेल तर मशिदी झाकून ठेवा. तिथे अल्पसंख्यांक असणारे हिंदू सुद्धा तितकेच कट्टर असल्याने तिथे राजवट कुणाचीही असो, मुस्लिम कितीही बहुसंख्यांक असो त्यांना या धार्मिक श्रद्धेला आव्हान देण्याची हिम्मत करता येत नाही. त्यामुळे आपला मिडिया मशिदी झाकल्या म्हणून गळे काढत असले तरी त्यांना माहिती नाही हैदराबाद मध्ये गेली कित्येक वर्षे हे करावेच लागत आहे.

मध्यंतरी तेलंगणा अर्थात हैदराबादमध्ये के सी आर ची परम मुस्लिम तुष्टीकरण राजवट असताना एका हिंदू मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केला गेला. आरोपी पकडले गेले परंतु जनमानस पराकोटीचे प्रक्षुब्ध झाले आहे हे बघून या चारही गुन्हेगारांना एंकाऊंटर करून मारून टाकले. संतप्त आणि कट्टर जनमानस सरकारला वेळकाढूपणा सुद्धा करू देत नाही.

याचा अर्थ काय ?

हिंदू अल्पसंख्यांक असला पण तो सुद्धा जर कट्टर असला तर प्रशासनाला आणि मुस्लिमांना झुकवू शकतो.

या घटनाक्रमाचा महाराष्ट्रातील हिंदूंनी गंभीरपणाने विचार करणे आवश्यक आहे. हिंदूंनी एकत्रित येऊन जातपात असा सर्व भेद नाकारून महायुती सरकारल 232 जागा मिळवून दिल्या आहेत परंतु गेल्या 3-4 महिन्यात या सरकारकडून मुस्लिमांच्या उर्मटपणाला आणि बेकायदेशीर वर्तनाला वेसण घालणार्‍या कृतींना सुरुवात झालेली नाही. या दृष्टीने हिंदूंनी एकत्र येऊन सरकारवर दडपण आणायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

तुम्ही एकत्र याल आणि कट्टर व्हाल तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही अल्पसंख्यांक असा किंवा बहुसंख्यांक , हैदराबाद मधील हिंदूंच्या सारखे ताठ मानेने जगाल. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादाला मतदान कराल तर संभल मधील हिंदूंच्या सारखे अल्पसंख्यांक असतांनाही प्रशासनाच्या मदतीने सुखाने जगू शकाल. परंतु जर तुम्ही महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्ष बोकळलेल्या सर्वधर्मसमभावाच्या आहारी जाऊन जगाल तर फर्दापूर मधील हिंदूंच्या सारखे घाबरून जगावे लागेल. तुम्हाला होळीसारखे सण सुद्धा साजरे करता येणार नाही. पोलिस प्रशासन तुम्हालाच गुन्हेगार असल्याप्रमाणे वागवेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे फर्दापूर मधील घटनाक्रम अत्यंत गांभीर्‍याने घेतला जाऊन सादर पोलिस अधिकार्‍यावर तत्काल कारवाई करावी आणि अब्दुल सत्तार यांना सुद्धा वेसण घालणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात आली आहे. केचे, राजूरकर आणि भंडारी यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती येत आहे. परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. असो!

महत्वाची बाब अशी ऐकण्यात येत आहे की गेले काही दिवस अमित ठाकरे यांच्यासाठीही प्रयत्न सुरू होते, पण केंद्रीय भाजपकडून त्यांस नकार देण्यात आला आहे. परवा मनसेचे इंजिन महाकुंभवर घसरले त्याचे हेच कारण असेल का?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ईद च्या दिवशी तुम्हाला समस्त मुसलमान मंडळी पठाणी ड्रेस घालून मिरवताना दिसतात. आपल्या बेअब्रूला आपला पोशाख बनवणारी आणि तो घालून स्वतःला महान समजणारी जगाच्या पाठीवर दुसरी जमात नसेल.

सत्य जाणून घ्यायचे आहे का ?

हरी सिंह नलवा !

हे नाव आपल्या इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला सुद्धा मिळणार नाही...

हे कोण होते ?

शेर ए पंजाब,

खालसाजी का चँपियन

असा ज्याचा उल्लेख केला जातो ते हरी सिंह नलवा हे महाराजा रणजीतसिंह यांच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांनी केवळ ४६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी संपूर्ण पंजाब , काश्मीर , अफगाणिस्तान शिखांच्या अधिपत्याखाली आणला.

पठाणी वेषाची कथा जाणून घ्या.....

"महाराजा रणजीत सिंह यांची सेना 1820 मध्ये हरि सिंग नलवा यांच्या नेतृत्वाखाली सीमेजवळ पोहोचली... हरि सिंग नलवा यांच्या सेनेने पठाणांच्अया सेनेला अगदी सहज पराभूत केले.

अफगाणिस्तानच्या संपूर्ण लिखित इतिहासात हा एकमेव प्रसंग आहे जेव्हा अफगानिस्तानवर परकीय सत्ता लादली गेली आणि ते गुलाम झाले.

शिख सैन्याचे भय पठाणांमध्ये इतके होते की बाजारात शिख सैनिक दिसले की ते लपून बसायचे. जो कोणी शिखांचा विरोध करत असे, त्याला निर्दयपणे ठेचले जात असे. त्या काळात असे प्रसिद्ध होते की शिख कधीही तीन प्रकारच्या लोकांचा वध करत नसत – पहिल्या म्हणजे महिला, दुसऱ्या म्हणजे मुले आणि तिसऱ्या म्हणजे वृद्ध.

या भीतीमुळे पठाणांनी पंजाबी महिलांनी परिधान केलेली सलवार कमीज घालायला सुरुवात केली. हळूहळू असा काळ आला की पुरुष आणि स्त्रिया एकसारखी वस्त्रे परिधान करू लागले.

यानंतर, शिख सैन्यानेही अशा पठाणांना मारणे टाळले जे महिलांची सलवार घालत होते.

प्रत्यक्षात, शिख सैन्याच्या समोर पठाणांनी सलवार परिधान करणे म्हणजे त्यांचे आत्मसमर्पण करण्याचे लक्षण होते.

आत्मसमर्पण करणारे पठाण पुन्हा कधीही आक्रमण करीत नसत.

पठाणांचे रक्त शुद्ध होते त्यामुळे शरण आलेले पठाण कधी दगा फटका करत नव्हते. पण भारतात पठाणांच्या संतती नसून मुघलांच्या संतती आहेत आणि त्यामुळे त्यांना औरंग्या भारी वाटतो आणि त्यांना दगाबाजी करणे हीच मर्दुमकी वाटते..

ही कथा लक्षात ठेवा.. ईद च्या दिवशी पठाणी घालून अहंकाराने फिरणारे येडे दिसले की आपोआप हसू फुटेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुख्य मीडियात न आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी. मिजोरम मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपाने इथे निवडणूक लढवली आणि घवघवीत यश प्राप्त केले. नरेंद्र मोदींनी वॅटिकन सिटीला जाऊन पॉप यांची भेट घेतल्याबद्दल हिंदुत्ववादी मंडळी चिडली होती परंतु भाजपा ख्रिस्ती संप्रदायाची पण काळजी करते हा संदेश यातून दिला गेला आणि ८७ % ख्रिस्ती नागरिक असणार्‍या मिजोरम मध्ये भाजपाने भगवा फडकावला. एकूण ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली ज्यात भाजपाने तब्बल ६४ ठिकाणी विजय मिळवला आहे. एकूण ५१६ पैकी ३६४ जागा भाजपाने जिंकल्या असून आपले लाडके राजपुत्र राहुल गांधी यांच्या पक्षाने ५१६ पैकी दोन जागा जिंकल्या आहेत आणि शून्य ग्रामपंचायतीत कोंग्रेसची राजवट आली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कोंग्रेस पक्षाचा शून्याकडे होत असलेला प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक गतिमान होतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आम आदमी पार्टीचे विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झाले आणि आता त्यांचे अच्छे दिन संपुष्टात आले आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामात १३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. हे प्रकरण २०२२ चे असून त्यावेळी दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयाकडून या घोटाळ्याच्या चौकशीची शिफारस केली होती आणि याचा अहवाल त्यांनी मुख्य सचिवांना अहवाल सादर केला. मंत्रीपदावरील व्यक्तिवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींची मंजूरी लागते ती मिळाल्याने आता दारू घोटाळ्याच्या जोडीला बांधकाम घोटाळ्यासाठी पण आम आदमी पार्टीचे नेते तुरुंगात जाणार असे दिसते आहे. अरविन्द केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दारू घोटाळ्यात अडकले आहेत. जोडीला मोहल्ला क्लिनिक योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे. एकंदर भारतीय राजकारणात भरष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची वचने देणारा राजकीय पक्ष आज भ्रष्टाचाराच्या गर्तेत खोल बुडालेला दिसून येतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ठाणे महापालिकेत एकनाथ शिंद्यांच्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला असून ३३७ कोटी रूपयांचा हिशोब लागत नसल्याचा दावा आमदार संजय केळकर यांनी करून वातावरण तापवले आहे. या महापालिकेचे लेखापरीक्षण २०१९-२० पासून पुढील पाच वर्ष झालेच नसून महापालिकेला आलेला निधि आणि त्याचा विनियोग यांचा विचार केला तर ३३७ कोटी रुपये बेहिशोबी खर्च झाले आहेत असा निष्कर्ष निघतोय असा आरोप संजय केळकर यांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सगळ्याचा हिशोब मिळेल अशी सारवासारव केली आहे. जितेंद्र आव्हाड हपापाचा माल गपापा असे म्हणून यावर तुटून पडले आहेत. महापालिकेने केलेल्या खर्चाचे ऑडिट न होणे ही सर्वसामान्य करदात्याची फसवणूक असून याला आयुक्त जबाबदार असल्याचा दावाही म्हस्के यांनी केला आहे. महापालिका निवडणूक वर्षभरणे होण्याची शक्यता असली तरी यावेळी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळी लढण्याची चर्चा असल्याने भाजपकडून एकनाथ शिंदे युतीत असूनही त्यांच्या पक्षवर टीका करण्याची संधी साधली जाते आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

चर्चेत रहाण्याची कला शरद पवार यांना सर्वोत्तम रित्या अवगत आहे आणि ही गोष्ट ते वारंवार सिद्ध करत असतात. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीयम मध्ये ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि या कार्यक्रमाला पवारांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आले. या कार्यक्रमाचे आयोजक सरहद या संस्थेचे संजय नहार होते तरीही संपूर्ण कार्यक्रम हा शरद पवारांच्याच प्रभावाखाली आयोजित झाला आहे हे पदोपदी जाणवत होते. या निमित्ताने शरद पवारांची मराठी साहित्य परिषदेवरील पकड सुद्धा अधोरेखित झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानणारे पत्र लिहीत पवारांनी मोदींच्या कडे अजून एक मागणी रेटली आहे. मोदींना लिहीलेल्या पत्रात पवारांनी मोदींच्या भाषणाचा गौरव करताना ‘सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण’ असा उल्लेख केला आहे.मोदींना पत्रात पवारांनी एक मागणी केली आहे. तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत, अशी महाराष्ट्रातील साहित्यिकांची आणि सामानी जनतेची इच्छा असून या इच्छेला मूर्त स्वरूप केवळ आपल्यामुळेच प्राप्त होईल अशी मखलाशी सुद्धा पवारांनी केली आहे. थोडक्यात अजून एक कार्यक्रम ज्याला मोदीजी येणार आणि अजून एकदा सबकुछ पवार इव्हेंट होणार.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्राला काळिमा फासणार्‍या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निष्क्रिय वर्तन करणार्‍या आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांना निलंबित केले गेले होते. हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजते आहे आणि या प्रकरणात विकृत अश्या गुन्हेगारांना न्यायालयाकडून लवकरात लवकर आणि कठोरातील कठोर शिक्षा केली जावी ही प्रत्येक सामानी नागरिकाची इच्छा आहे. परंतु या प्रकरणाचे गांभीर्य पोलिस कर्मचार्‍यांना समजले नाही आणि त्यामुळे त्यांना निलंबित व्हावे लागले. परंतु अजूनही आपण चूक केली आहे असे त्यांना वाटत नाही त्यामुळे ते निर्लज्जपणे धूळवड साजरी करताना दिसत आहेत. या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले या निलंबित कर्मचार्‍यांसह रंगाची उधळण करताना दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र यासंदर्भातील छायाचित्रे बघून हतबुद्ध झाला आहे. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ बघून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या न्यायमूर्तींना या खटल्यातून तत्काल मुक्त केले जावे अशी सामान्य नागरिकांनी मागणी केली आहे कारण आका वाल्मिक कराडला पाठीशी घालण्यासाठी आपल्या कर्तव्यात कसूर करणारे पोलिस कर्मचारी आणि न्यायाधीश जर एकत्र होळी साजरी करत असतील तर दोघांची मानसिकता समान आहे आणि अश्या परिस्थितीत संतोष देशमुख यांना न्याय मिळणे अशक्य आहे.

🔽















 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page