🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 16
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
32 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी विध्वंसाची पुनरावृत्ती होणार का? छत्रपती संभाजीनगर जवळ रत्नपूर / खुलताबाद या गावातील औरंगजेबची कबर उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे. विश्व हिंदू परिषद आधी सनदशीर मार्गाने हा विषय हाताळणार असून ते सर्वप्रथम औरंगजेबची कबर काढण्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत. त्यानंतर 17 मार्चला राज्यातल्या तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. या आंदोलनानंतर काही दिवसांचं अल्टिमेटम सरकारला दिलं जाणार आहे. त्यानंतरही काही न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार, आंदोलनानंतरही काही न झाल्यास कारसेवा सुरू करत कबर उखडून टाकण्याचा विश्व हिंदू परिषदेने निर्णय घेतला आहे. अयोध्येमध्ये जसे कार सेवक गेले होते त्या प्रकारची भूमिका विश्व हिंदू परिषद या बाबत घेण्याचा इशारा देखील दिला आहे. विश्व हिंदू परिषदेला केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देणार का ? त्यांना कायदा हातात घेण्याची वेळ येणार ? हे येणार्या काळात उलगडेल. परंतु औरंग्याच्या थडग्याला इतके दिवस दया दाखवली गेली ही सरकारचीच चूक आहे असे सामान्य जनतेचे मत आहे त्यामुळं हे थडगे उध्वस्त झाले तर सामान्य निश्चितच आनंदी होतील.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हाफिज सईद मारला गेला ? पाकिस्तानात कार्यरत असणार्या अज्ञातांनी एक मोठीच कामगिरी बजावली आहे. गेली काही वर्ष सातत्याने अज्ञात मंडळी पाकिस्तानातील भारताच्या शत्रूंचा खातमा करत आहेत. या मालिकेत रमजानच्या महिन्यात एक मोठीच कामगिरी फत्ते केल्याची वार्ता येत आहे. ही चर्चा सध्या पाकिस्तानी मीडियावर चांगलीच रंगली आहे. पंजाब प्रांतात एका कारवर मोटारसायकल वरुन आलेल्या बंडखोरांनी हल्ला केला आणि बेछूट गोळीबार केला. त्यात एक जण जखमी झाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मेलेल्या दोघातील एक जण हाफिज सईद असल्याचा दावा केला जातो आहे. जर ही वार्ता खरी असेल तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मारला गेल्याचा आनंद भारतीय साजरा करू शकतील. गेली कित्येक वर्षे हाफिज सईद याला पाकिस्तानने सांभाळले आणि पोसले होते. भारताने वारंवार मागणी करूनही त्याचे प्रत्यर्पण केले नव्हते. आता त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नरेंद्र मोदी जगभर यू पी आय चा प्रचार प्रसार करत आहेत आणि त्याचेच एक अंग असणारे रुपे कार्ड भारतीय बँका देशांतर्गत नाकारत आहेत असे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन्०सी०पी०आय० या सरकारी यूपीआय ही सॉफ्टवेअर मोबाईल अॅप प्रणाली व रुपे ही ईलेक्ट्रॉनिक कार्ड प्रणाली विकसित केली. ईलेक्ट्रॉनिक कार्ड प्रणाली रुजू घालताना ते प्लॅस्टिक कार्ड उत्पादित करून ते कार्ड व्यापारी यंत्रावर आणि ए०टी०एम्० यंत्रांवर देखील चालविण्याची पार्श्वभूमी तयार करावी लागते. रुपे कार्ड व्यवस्थेने हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. हे कार्ड अर्थव्यवस्थेत अवतरण्यापूर्वी व्हिसा, मास्टरकार्ड, अमेक्स ई०ई० अनेक कार्ड डॉलरला मजबूत करत होते. सर्व शासकीय भारतीय बँकांनी रुपे कार्ड आपल्या ग्राहकांना देणे जरुरीचे आहे. परंतु असे होत नाही. सरकारी, खाजगी आणि सहकारी बँका यांना रुपे कार्डचा प्रचार आणि प्रसार करतच नाहीत. यामागे आर्थिक हितसंबंध निश्चितच आहेत. रुपे कार्ड वापरले तर व्यापाऱ्याकडून त्या संबंधित व्यवहारासाठी किमान साडे तीन ते अधिक टक्के इतकी रक्कम कार्ड मशीन पुरवणारी कंपनी कापून घेते. त्यामुळे बहुतेक व्यापारी रुपे कार्ड नको असे म्हणतात. या यंत्र पुरवणार्या कंपन्या आता रुपे कार्डच स्वीकारत नाहीत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विधानसभा 2024 च्या निवडणुकीत पानिपत झाल्याने मौनव्रत धारण केलेले नाना पटोले अखेरीस बोलले. आणि जे बोलले ते थेट उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अश्या पद्धतीचे बोलले. नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या आघाडीशी हातमिळवणी केल्यास दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याची संधी देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. महायुतीमध्ये उभय नेत्यांची घुसमट होत असल्याचेही नाना पटोले म्हणाले. असले भन्नाट वक्तव्य करायला त्यांनी धूळवडीचा मुहूर्त निवडल्याने ते भांगेच्या नशेत बोलले असावेत असा संशयाचा फायदा त्यांना नक्की मिळू शकतो. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला अक्षरशः लाथाडले आहे. स्वतः नाना पटोले 200-300 मतांनी निवडून आले आहेत आणि हे कुणाला सल्ले देत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकट्याला जितके आमदार निवडून आणता आले आहेत तितके या तिघांना मिळून निवडून आणणे शक्य झाले नाही आणि हे एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री करतो आमच्याकडे या असे बोलावत आहेत. माणसाने स्वप्नरंजन करावे पण त्याला सुद्धा काही मर्यादा असते. नाना तुमची भांग उतरली की मग परत हेच वाक्य बोलता येते का बघूया.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राचे नागरीकरण महाराष्ट्रातील शेतीचा गळा घोटत आहे का ? महाराष्ट्राला खरच इतक्या प्रचंड प्रमाणात औद्योगिक विकासाची आवश्यकता आहे का ? हे प्रश्न पडावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरीकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होणे ही राष्ट्रीय समस्या आहे. राष्ट्रीय पातळीवर पाच टक्के कृषि क्षेत्र कमी झाले असले तरी यातील निम्मे क्षेत्र एकट्या महाराष्ट्रातील कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील कृषि क्षेत्र तब्बल 3.25 लाख हेक्टर ने कमी झाले आहे. महाराष्ट्राला विकास हवा आहे. महाराष्ट्राला नागरीकरण हवे आहे. पण ते कृषि क्षेत्राचा गळा घोटून नको आहे. त्यामुळे शासनाने योजना आखताना याचा विचार करणे आवश्यक आहे. आधी अस्तीत्वात असलेल्या महामार्गाचा विस्तार करणे वेळखाऊ काम आहे म्हणून स्वतंत्र महामार्ग बनवण्याची पद्धत रूढ होते आहे पण यात शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणावर संपादित कराव्या लागणार असतील तर अस्तीत्वात असणार्या महामार्गांचा वापर करून त्यात मध्ये मध्ये अंतर कमी करणारे कनेक्टर जोडूनही जर त्या महामार्गाला वेगवान करणे शक्य असेल तर तो पर्याय विचारात घेतला पाहिजे.
🔽






Comments